शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा दौरा २०० जनावरांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 18:35 IST

Governor Bhagat Singh Koshyari's Parabhani visit : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासूनच प्रवेश बंदीचारा मिळत नसल्याने पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिव्याख्यात्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

परभणी: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (  Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth) परिक्षेत्रात असलेले पशूवैद्यकीय महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चाऱ्याअभावी दोनशे जनावरांची उपासमार होत असल्याची तक्रार या महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे सर्व कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातच आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले असले तरी विद्यापीठाच्या परीक्षेत्रात असलेल्या पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मात्र ओळखपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना या परिसरात प्रवेश करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. परिणामी पशूवैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या २०० जनावरांना शुक्रवारी चारा मिळाला नाही. शनिवारीही दौऱ्यामुळे चारा मिळण्याची शक्यता नाही. शिवाय दररोज या पशूवैद्यकीय महाविद्यालयात परिसरात विविध गावांमधील २०० पेक्षा अधिक जनावरे उपचारासाठी येतात. त्यांनाही प्रतिबंध करण्यात आल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे. 

या अनुषंगाने पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कण्डेय यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यात कृषी विद्यापीठ प्रशासनाने पशूवैद्यकीय महाविद्यालयास दुर्लक्षित केले. या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पास देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे १०० कर्मचाऱ्यांना कामावर जात आले नाही. तसेच पशूवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या २०० पेक्षा अधिक जनावरांना चारा मिळालेला नाही, असेही या तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य हालगर्जीपणामुळे या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली असून शेकडो जनावरांना वेळेवर उपचारही मिळत नसल्याचे तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून खुलासा मागून घ्यावा, अशीही मागणी तक्रार अर्जात केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ