शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा दौरा २०० जनावरांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 18:35 IST

Governor Bhagat Singh Koshyari's Parabhani visit : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासूनच प्रवेश बंदीचारा मिळत नसल्याने पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिव्याख्यात्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

परभणी: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (  Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth) परिक्षेत्रात असलेले पशूवैद्यकीय महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चाऱ्याअभावी दोनशे जनावरांची उपासमार होत असल्याची तक्रार या महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे सर्व कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातच आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले असले तरी विद्यापीठाच्या परीक्षेत्रात असलेल्या पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मात्र ओळखपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना या परिसरात प्रवेश करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. परिणामी पशूवैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या २०० जनावरांना शुक्रवारी चारा मिळाला नाही. शनिवारीही दौऱ्यामुळे चारा मिळण्याची शक्यता नाही. शिवाय दररोज या पशूवैद्यकीय महाविद्यालयात परिसरात विविध गावांमधील २०० पेक्षा अधिक जनावरे उपचारासाठी येतात. त्यांनाही प्रतिबंध करण्यात आल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे. 

या अनुषंगाने पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कण्डेय यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यात कृषी विद्यापीठ प्रशासनाने पशूवैद्यकीय महाविद्यालयास दुर्लक्षित केले. या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पास देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे १०० कर्मचाऱ्यांना कामावर जात आले नाही. तसेच पशूवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या २०० पेक्षा अधिक जनावरांना चारा मिळालेला नाही, असेही या तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य हालगर्जीपणामुळे या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली असून शेकडो जनावरांना वेळेवर उपचारही मिळत नसल्याचे तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून खुलासा मागून घ्यावा, अशीही मागणी तक्रार अर्जात केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ