शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा दौरा २०० जनावरांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 18:35 IST

Governor Bhagat Singh Koshyari's Parabhani visit : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासूनच प्रवेश बंदीचारा मिळत नसल्याने पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिव्याख्यात्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

परभणी: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (  Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth) परिक्षेत्रात असलेले पशूवैद्यकीय महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चाऱ्याअभावी दोनशे जनावरांची उपासमार होत असल्याची तक्रार या महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे सर्व कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातच आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले असले तरी विद्यापीठाच्या परीक्षेत्रात असलेल्या पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मात्र ओळखपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना या परिसरात प्रवेश करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. परिणामी पशूवैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या २०० जनावरांना शुक्रवारी चारा मिळाला नाही. शनिवारीही दौऱ्यामुळे चारा मिळण्याची शक्यता नाही. शिवाय दररोज या पशूवैद्यकीय महाविद्यालयात परिसरात विविध गावांमधील २०० पेक्षा अधिक जनावरे उपचारासाठी येतात. त्यांनाही प्रतिबंध करण्यात आल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे. 

या अनुषंगाने पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कण्डेय यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यात कृषी विद्यापीठ प्रशासनाने पशूवैद्यकीय महाविद्यालयास दुर्लक्षित केले. या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पास देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे १०० कर्मचाऱ्यांना कामावर जात आले नाही. तसेच पशूवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या २०० पेक्षा अधिक जनावरांना चारा मिळालेला नाही, असेही या तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य हालगर्जीपणामुळे या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली असून शेकडो जनावरांना वेळेवर उपचारही मिळत नसल्याचे तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून खुलासा मागून घ्यावा, अशीही मागणी तक्रार अर्जात केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ