शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

परभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:40 IST

नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.

परभणी : नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.

गतवर्षी जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र तुरीचे चांगले उत्पन्न निघाल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणीचा डोंगर पार करावा लागला होता. काही शेतकर्‍यांना तर दोन- दोन महिने केंद्रासमोर आपल्या वाहनांच्या रांगा लावाव्या लागल्या होत्या. शेतकरी व तूर खरेदी केंद्र प्रशासनात अनेक खटके उडाले होते. तूर उत्पादकांचा रोष पाहता राज्य शासनाला तीनवेळेस मुदतवाढही द्यावी लागली होती. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात गतवर्षी २ लाख ८० हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. 

याही वर्षी शेतकर्‍यांना बर्‍यापैकी तुरीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गतवर्षीसारखी परिस्थिती याहीवर्षी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक झाला आहे. खरीपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही बहरली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. परंतु, नैसर्गिक संकटाने शेतकर्‍यांचे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकर्‍यांकडे केवळ तुरीचा शेतमाल शिल्लक आहे. परंतु, व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचा शेतीमाल घेताना अडवणूक केली जात आहे. 

सेलू, परभणी, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, बोरी या ठिकाणी नाफेडच्या वतीने तर मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने भावीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. गुरुवारपर्यंत परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. या केंद्रावर शुक्रवारपासून प्रत्यक्ष तूर खरेदीस सुरुवात होणार आहे.  यावर्षी जवळपास साडेतीन हजाराच्या वर तूर उत्पादक शेतकर्‍यांनी आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. 

चार ठिकाणी टप्प्या-टप्प्याने होणार सुरुवातनाफेडच्या वतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा, गंगाखेड, बोरी या सहा ठिकाणी तर विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. त्यापैकी नाफेडकडून जिल्ह्यात तीन ठिकाणच्या केंद्रांचे उद्घाटन झाले आहे. नाफेडच्या पूर्णा, गंगाखेड, बोरी व विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र येत्या आठ दिवसात सुरु  करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

खाजगी बाजारपेठेत कवडीमोल दरराज्य शासनाने तूर उत्पाकांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापार्‍यांकडून केवळ ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. बाजार समितीच्या प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी