शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

लसीकरणात सोनपेठची पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मागच्या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात केवळ ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांनी लसीकरण केले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : मागच्या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात केवळ ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांनी लसीकरण केले असून, सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी २३ हजार ८५९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर प्रशासनाने लसीकरणावर भर दिला. गावो-गावी जनजागृती झाली; परंतु कधी लसीचा तुटवडा तर कधी नागरिकांची उदासिनता, यामुळे लसीकरणाचा वेग अजूनही वाढलेला नाही. जिल्ह्यात १६ लाख ८ हजार ८३८ नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. तालुकानिहाय लसीकरणाचा आढावा घेतला तेव्हा सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी २३ हजार ८५९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात १९ हजार २११ नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला असून, ४ हजार ६४८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. परभणी तालुक्यात मात्र लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. तालुक्यात आतापर्यंत १ लाख १८ हजार ८७५ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणाऱ्या नागरिकांची संख्या ३२ हजार ३१० एवढी आहे. ग्रामीण भागात वेग वाढविण्याची गरज आहे.

लसीच्या तुटवड्याचा परिणाम

मागील १०-१२ दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम लसीकरणावर होत आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे दररोज १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी दोन ते अडीच हजार डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती कमी झाली आहे.

जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक केंद्रावर लसीकरण केले जाते; मात्र प्रत्यक्षात लस उपलब्ध नसल्याने ७० ते ७८ केंद्रांवरूनच लसीकरण सत्र राबवावे लागत आहे. लसीअभावी इतर केंद्र बंद राहत आहेत.

कर्मचाऱ्यांचीही लसीकरणाला पाठ

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण केले जात असताना दुसरीकडे आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनीदेखील लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १४ हजार ३७२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी ११ हजार ४७८ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला. तर कोरेाना योद्धा असलेल्या २८ हजार ७६७ कर्मचाऱ्यांपैकी २८ हजार ६०६ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे.

१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण करावयाचे आहे. त्यात ज्येष्ठांनी पुढाकार घेतला असून, ४५ वर्षांपेक्षा पुढील २ लाख ८८ हजार ९२८ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. त्यात २ लाख १९ हजार ७७२ जणांनी पहिला तर ६९ हजार १५६ जणांनी दोन्ही डोस घेतले.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९७ हजार ५९५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ३ लाख ९३ हजार २३२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, १ लाख ४ हजार ३३६ नागरिकांनी दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करून घेतले आहे.