शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

टर्फ विकेटचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST

ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कोट्यवधी ...

ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो; परंतु परभणी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांत स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही तालुका क्रीडा संकुल उभारण्यात राज्य शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव दररोज ग्रामीण भागातील युवकांवर रस्त्याच्या कडेने धावण्याचा सराव करण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे जिल्हा क्रीडा संकुलात शहरातील खेळाडूंना क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस यांसह अनेक आदी खेळांचा सराव करण्यासाठी सुसज्ज असे मैदान उपलब्ध आहे. खेळाडूंना जिल्हा क्रीडा संकुलात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी हजारो रुपयांचा खर्च केला जातो. तरीही भौतिक सुविधांची वाणवा या ठिकाणी दिसून येते. क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा संकुलात मागील अनेक वर्षांपासून टर्फ विकेट तयार करावी, यासाठी संघटना व खेळाडूंची मागणी आहे. या मागणीचा विचार करून लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास २० लाखांचा निधी मंजूर करीत येथील मैदानात टर्फ विकेटचे काम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र हा निधी मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. विशेष म्हणजे केवळ माती टाकून या टर्फ विकेटचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खेळाडूंना सुविधांसाठी निधी उपलब्ध असूनही जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या उदासीन धोरणामुळे टर्फ विकेटचे काम वर्षभरापासून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे.

क्रीडा संघटना नावालाच

शहरातील खेळाडूंना भौतिक सुविधांसह वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण व त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी क्रीडा संघटनांची, असोसिएशनची उभारणी केली जाते. परभणी जिल्ह्यात जवळपास ७१ हून अधिक संघटना, असोसिएशन कार्यरत आहेत; मात्र जिल्हा क्रीडा संकुलात मागील वर्षभरापासून टर्फ विकेटचे काम सुरू असून, ते पूर्णत्वास जात नाही, याबाबत एकाही संघटनेने आवाज उठविलेले नाही. त्यामुळे जिल्हा क्रीडांगणात खेळाडूंना सुविधांचा सामना करावा लागत असताना या संघटना एकही शब्दही बोलत नाही. त्यामुळे या संघटना नावापुरत्याच आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.