शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

टर्फ विकेटचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST

ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कोट्यवधी ...

ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो; परंतु परभणी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांत स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही तालुका क्रीडा संकुल उभारण्यात राज्य शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव दररोज ग्रामीण भागातील युवकांवर रस्त्याच्या कडेने धावण्याचा सराव करण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे जिल्हा क्रीडा संकुलात शहरातील खेळाडूंना क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस यांसह अनेक आदी खेळांचा सराव करण्यासाठी सुसज्ज असे मैदान उपलब्ध आहे. खेळाडूंना जिल्हा क्रीडा संकुलात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी हजारो रुपयांचा खर्च केला जातो. तरीही भौतिक सुविधांची वाणवा या ठिकाणी दिसून येते. क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा संकुलात मागील अनेक वर्षांपासून टर्फ विकेट तयार करावी, यासाठी संघटना व खेळाडूंची मागणी आहे. या मागणीचा विचार करून लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास २० लाखांचा निधी मंजूर करीत येथील मैदानात टर्फ विकेटचे काम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र हा निधी मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. विशेष म्हणजे केवळ माती टाकून या टर्फ विकेटचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खेळाडूंना सुविधांसाठी निधी उपलब्ध असूनही जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या उदासीन धोरणामुळे टर्फ विकेटचे काम वर्षभरापासून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे.

क्रीडा संघटना नावालाच

शहरातील खेळाडूंना भौतिक सुविधांसह वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण व त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी क्रीडा संघटनांची, असोसिएशनची उभारणी केली जाते. परभणी जिल्ह्यात जवळपास ७१ हून अधिक संघटना, असोसिएशन कार्यरत आहेत; मात्र जिल्हा क्रीडा संकुलात मागील वर्षभरापासून टर्फ विकेटचे काम सुरू असून, ते पूर्णत्वास जात नाही, याबाबत एकाही संघटनेने आवाज उठविलेले नाही. त्यामुळे जिल्हा क्रीडांगणात खेळाडूंना सुविधांचा सामना करावा लागत असताना या संघटना एकही शब्दही बोलत नाही. त्यामुळे या संघटना नावापुरत्याच आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.