शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

सहा महिन्यांत १२६० वन्यजिवांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

परभणी : जिंतूर तालुक्याच्या ५० कि.मी.च्या परिघात मागच्या सहा महिन्यांत तब्बल १ हजार २६० वन्यजिवांना प्राण गमवावे लागले. त्याच्या ...

परभणी : जिंतूर तालुक्याच्या ५० कि.मी.च्या परिघात मागच्या सहा महिन्यांत तब्बल १ हजार २६० वन्यजिवांना प्राण गमवावे लागले. त्याच्या नोंदी मात्र कुठेही नाहीत. जिंतुरातील वन्यजीव अभ्यासकांनी या नोंदी घेऊन रस्ते अपघातातील वन्यजिवांच्या मृत्यूचे गांभीर्य प्रशासनासमोर मांडले आहे. त्यामुळे पर्यावरणातील या महत्त्वाच्या घटकाच्या अपघाती मृत्यूकडे शासन- प्रशासन गांभीर्याने पाहणार आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

वाढते शहरीकरण आणि त्यात वाढलेल्या दळण-वळणाच्या समस्यांमुळे रस्ते अपघात ही नवी समस्या पुढे येत आहे. या अपघातात मानवी मृत्यूच्या नोंदी प्रशासन घेत असले तरी प्राण्यांच्या मृत्यूबाबत फारसे गांभीर्य घेतले जात नाही. पर्यावरणाच्या संवर्धनात वन्यजिवांचाही तेवढाच वाटा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील पक्षिमित्र अनिल उरटवाड यांनी ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ या काळातील वन्यजिवांच्या अपघाती मृत्यूच्या नोंदी घेतल्या. जिंतूर तालुक्यातील ५० कि.मी. परिसरातच त्यांनी या नोंदी घेतल्या, तर त्याचा आकडा सहा महिन्यांत एक हजारांपेक्षाही पुढे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ही संख्या किती असेल याचा अंदाज बांधता येईल. यावरून वन्यजिवांचे रस्ते अपघात हा गंभीर विषय पुढे येत आहे. वनविभागासह उपप्रादेशिक परिवहन विभागाने यात पुढाकार घेऊन खबरदारी घेण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र त्यात वन्यजिवांच्या मृत्यूविषयी साधा उल्लेखही नसतो. त्यामुळे शासनाचे आता या विषयाचे गांभीर्य ओळखून पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिवास हिरावल्याने समस्या गंभीर

पक्षी अभ्यासक अनिल उरटवाड यांनी सांगितले, परभणी जिल्ह्यातील जैवविविधता अनेक संकटांना सामोरी जात आहे. वन्यजिवांची शिकार, विषप्रयोग, त्यांच्या अधिवासावर झालेले अतिक्रमण, वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण या कारणांमुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. शेती आणि खाणकामामुळे वन्यजिवांचे विविध प्रकारचे अधिवास नष्ट झाले. वन्यजिवांपैकी उदमांजर, रानमांजर, मांस भक्षक अन्न पाण्याच्या शोधात दररोज किमान २० ते २५ कि.मी.चा प्रवास करीत असतात. या दरम्यान ते मानवी वस्ती, द्रुतगती मार्गावर सहज येतात. प्राणी आणि पक्ष्यांचे नेहमीच स्थलांतर होते. एका पेक्षा अधिक अधिवासांचा ते वापर करतात. दरवर्षी लाखो पक्षी, प्राणी रस्त्यांवरील वाहनांच्या अपघातात जीव गमावतात. परभणी जिल्ह्यातही ही संख्या मोठी आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

ऑक्टोबर २० ते मार्च २१ या काळातील अपघाती मृत्यू

पक्षी : ७२०

साप : २००

प्राणी : ३४०

एकूण १२६०