शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

धक्कादायक; जिल्ह्यात कोरोनाने २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने मोठी धास्ती निर्माण केली असून, बुधवारी १ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली असून, २० ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने मोठी धास्ती निर्माण केली असून, बुधवारी १ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली असून, २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूही वाढले आहेत. दररोज १० ते १५ रुग्णांचे मृत्यू होत आहेत. १४ एप्रिल रोजी सर्वाधिक २० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शासकीय रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाला असून, खासगी रुग्णालयातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १४ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाला १४ एप्रिल रोजी ३ हजार १५८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या २ हजार ४१९ अहवालांमध्ये ८८८ आणि रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या ७३९ अहवालांमध्ये २८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ८२६ झाली असून, त्यातील १६ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५७९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार २९३ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात १४०, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४८, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२८, अक्षदा मंगल कार्यालयात १३२ आणि होम आयसोलेशनमध्ये ४ हजार १११ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

५२७ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात बुधवारी ५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. आतापर्यंत सर्वाधिक ५२७ रुग्ण एका दिवसात कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.