शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; जिल्ह्यात कोरोनाने २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने मोठी धास्ती निर्माण केली असून, बुधवारी १ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली असून, २० ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने मोठी धास्ती निर्माण केली असून, बुधवारी १ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली असून, २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूही वाढले आहेत. दररोज १० ते १५ रुग्णांचे मृत्यू होत आहेत. १४ एप्रिल रोजी सर्वाधिक २० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शासकीय रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाला असून, खासगी रुग्णालयातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १४ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाला १४ एप्रिल रोजी ३ हजार १५८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या २ हजार ४१९ अहवालांमध्ये ८८८ आणि रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या ७३९ अहवालांमध्ये २८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ८२६ झाली असून, त्यातील १६ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५७९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार २९३ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात १४०, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४८, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२८, अक्षदा मंगल कार्यालयात १३२ आणि होम आयसोलेशनमध्ये ४ हजार १११ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

५२७ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात बुधवारी ५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. आतापर्यंत सर्वाधिक ५२७ रुग्ण एका दिवसात कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.