शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:49 IST

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे.

परभणी- परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे. या संदर्भातील एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांना प्रदान केला. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे.या दहा दिवसांमध्ये एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नव्हता. पूर्वी शिवसेना-भाजपा युतीतील वाट्यानुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला आलेली होती. त्यामुळे गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाच्याच उमेदवारांनी येथून युतीचे नेतृत्व केले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपामध्ये निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेने आता युती न करता ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आपला स्वतंत्र उमेदवार उतरविण्याची तयारी शिवसेनेने चालविली होती. यासाठी वाशिम-बुलडाणा-अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांची या मतदारसंघात प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार बाजोरिया यांनी त्यांचे पुत्र विप्लव यांनाच या निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतला.या निर्णयावर रविवारी मुंबईत मातोश्रीवर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विप्लव बाजोरिया यांना पक्षाचा एबी फॉर्म प्रदान केला. यावेळी शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई, खा. बंडू जाधव, आ. गोपीकिशन बाजोरिया, वसमतचे आ. जयप्रकाश मुंदडा, परभणीचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय कच्छवे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्थानिक पदाधिका-यांनी बाजोरिया यांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.दरम्यान, शिवसेनेने बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करून भाजपालाच कोंडीत पकडले आहे. भाजपाकडे दोन्ही जिल्ह्यात मिळून फक्त ५१ सदस्यांचे संख्याबळ आहे. अशात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी असा तिरंगी मुकाबला झाल्यास सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाची दयनीय अवस्था होऊ शकते. त्यामुळे भाजपा जिल्ह्यातीलच इच्छुकांना उमेदवारी देते की शिवसेनेसारखा आर्थिकदृष्ट्या तगडा असलेला परजिल्ह्यातील उमेदवार मतदारसंघात उतरवून चुरस निर्माण करते, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.