शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:49 IST

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे.

परभणी- परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे. या संदर्भातील एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांना प्रदान केला. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे.या दहा दिवसांमध्ये एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नव्हता. पूर्वी शिवसेना-भाजपा युतीतील वाट्यानुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला आलेली होती. त्यामुळे गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाच्याच उमेदवारांनी येथून युतीचे नेतृत्व केले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपामध्ये निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेने आता युती न करता ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आपला स्वतंत्र उमेदवार उतरविण्याची तयारी शिवसेनेने चालविली होती. यासाठी वाशिम-बुलडाणा-अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांची या मतदारसंघात प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार बाजोरिया यांनी त्यांचे पुत्र विप्लव यांनाच या निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतला.या निर्णयावर रविवारी मुंबईत मातोश्रीवर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विप्लव बाजोरिया यांना पक्षाचा एबी फॉर्म प्रदान केला. यावेळी शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई, खा. बंडू जाधव, आ. गोपीकिशन बाजोरिया, वसमतचे आ. जयप्रकाश मुंदडा, परभणीचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय कच्छवे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्थानिक पदाधिका-यांनी बाजोरिया यांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.दरम्यान, शिवसेनेने बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करून भाजपालाच कोंडीत पकडले आहे. भाजपाकडे दोन्ही जिल्ह्यात मिळून फक्त ५१ सदस्यांचे संख्याबळ आहे. अशात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी असा तिरंगी मुकाबला झाल्यास सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाची दयनीय अवस्था होऊ शकते. त्यामुळे भाजपा जिल्ह्यातीलच इच्छुकांना उमेदवारी देते की शिवसेनेसारखा आर्थिकदृष्ट्या तगडा असलेला परजिल्ह्यातील उमेदवार मतदारसंघात उतरवून चुरस निर्माण करते, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.