शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

परभणीत पाचव्यांदा होणार शिवसेना-राष्ट्रवादीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 12:52 IST

राष्ट्रवादीच्या उमेदवारी घोषणेनंतर आता बोर्डीकरांच्या निर्णयाकडे लक्ष

- अभिमन्यू कांबळे

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असून, पाचव्यांदा हे पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ स्थापना झाल्यानंतर पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी या पक्षाकडून निवडणूक लढविली होती. याशिवाय काँग्रेसचे रावसाहेब जामकर हेही रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुरेश जाधव यांनी काँग्रेसचे उमेदवार जामकर यांचा ४३ हजार ६६५ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीचे वरपूडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली.

आघाडीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. त्यानंतर २००४, २००९, २०१४ अशी सलग तीन वेळा या मतदारसंघात राष्ट्रवादी- शिवसेना अशीच लढत झाली. या लढतीत प्रत्येक वेळी शिवसेनेने राष्ट्रवादीवर मात केली. आता पाचव्यांदा राष्ट्रवादी व शिवसेना एकमेकांविरोधात लढत देत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुलोद सरकारमधील दिवंगत माजी आमदार उत्तमराव विटेकर यांचे चिरंजीव तथा माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांचीच उमेदवारी निश्चित आहे. या संदर्भातील घोषणा झाली नसली तरी जाधव यांनी गेल्या वर्षभरापासून या संदर्भातील कामाला सुरुवात केली आहे. २५ मार्च रोजी ते उमेदवारी दाखल करणार आहेत. या निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीकडून कोण उमेदवार रिंगणात उतरणार, यावरही निकालीची गणिते अवलंबून आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा दबदबापरभणी लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. शिवाय मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा राष्ट्रवादीकडे आहेत. सेनेकडे केवळ एक विधानसभा मतदारसंघ आहे. भाजपाकडे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. असे असतानाही १९९१ पासून परभणी लोकसभा मतदारसंघावर १९९८ चा अपवाद वगळता सेनेचेच वर्चस्व राहिले आहे. 

बोर्डीकरांच्या निर्णयाकडे लक्षमाजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या भाजपत असल्या तरी अद्यापही त्या निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र तशी शक्यता वाटत नाही. बोर्डीकर मैदानात उतरल्या तर तिरंगी लढत होऊ शकते. त्यातून इतिहासाची पुनरावृत्ती किंवा नवीन इतिहासही घडू शकतो. त्यामुळे बोर्डीकर यांच्या निर्णयाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना