शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

परभणीत पाचव्यांदा होणार शिवसेना-राष्ट्रवादीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 12:52 IST

राष्ट्रवादीच्या उमेदवारी घोषणेनंतर आता बोर्डीकरांच्या निर्णयाकडे लक्ष

- अभिमन्यू कांबळे

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असून, पाचव्यांदा हे पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ स्थापना झाल्यानंतर पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी या पक्षाकडून निवडणूक लढविली होती. याशिवाय काँग्रेसचे रावसाहेब जामकर हेही रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुरेश जाधव यांनी काँग्रेसचे उमेदवार जामकर यांचा ४३ हजार ६६५ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीचे वरपूडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली.

आघाडीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. त्यानंतर २००४, २००९, २०१४ अशी सलग तीन वेळा या मतदारसंघात राष्ट्रवादी- शिवसेना अशीच लढत झाली. या लढतीत प्रत्येक वेळी शिवसेनेने राष्ट्रवादीवर मात केली. आता पाचव्यांदा राष्ट्रवादी व शिवसेना एकमेकांविरोधात लढत देत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुलोद सरकारमधील दिवंगत माजी आमदार उत्तमराव विटेकर यांचे चिरंजीव तथा माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांचीच उमेदवारी निश्चित आहे. या संदर्भातील घोषणा झाली नसली तरी जाधव यांनी गेल्या वर्षभरापासून या संदर्भातील कामाला सुरुवात केली आहे. २५ मार्च रोजी ते उमेदवारी दाखल करणार आहेत. या निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीकडून कोण उमेदवार रिंगणात उतरणार, यावरही निकालीची गणिते अवलंबून आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा दबदबापरभणी लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. शिवाय मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा राष्ट्रवादीकडे आहेत. सेनेकडे केवळ एक विधानसभा मतदारसंघ आहे. भाजपाकडे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. असे असतानाही १९९१ पासून परभणी लोकसभा मतदारसंघावर १९९८ चा अपवाद वगळता सेनेचेच वर्चस्व राहिले आहे. 

बोर्डीकरांच्या निर्णयाकडे लक्षमाजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या भाजपत असल्या तरी अद्यापही त्या निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र तशी शक्यता वाटत नाही. बोर्डीकर मैदानात उतरल्या तर तिरंगी लढत होऊ शकते. त्यातून इतिहासाची पुनरावृत्ती किंवा नवीन इतिहासही घडू शकतो. त्यामुळे बोर्डीकर यांच्या निर्णयाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना