शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील सात प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाची ख्याती असली तरी आज मात्र या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ मृतसाठ्यामध्ये १०२ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून दिली जात आहे़ परंतु, या मृतसाठ्यात गाळ किती याचा अंदाज नसल्याने १०२ दलघमी पैकी किती पाणी उपलब्ध होवू शकते़ हाही प्रश्नच आहे़ मागील वर्षीच्या उन्हाळ्यात परभणीसह ४ तालुक्यांना दिलासादायक ठरलेला निम्न दूधना प्रकल्प यावर्षी कोरडा पडला आहे़ या प्रकल्पातही जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ विशेष म्हणजे मागील वर्षी एप्रिल महिन्यात या प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़सद्यस्थितीला मृतसाठ्यामध्ये ९३़२०० दलघमी पाणी शिल्लक आहे़ हे पाणी सेलू शहरासह तालुक्यातील इतर गावांसाठीच वापरावे लागणार आहे़ परिणामी परभणी, पूर्णा या दोन तालुक्यांना पाण्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे़जिंतूर तालुक्यात करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ०़६९३ (३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे तर गंगाखेडच्या मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही़ त्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे़ याशिवाय जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प आहेत़ परंतु, एकाही प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या कचाट्यात सापडला आहे़ या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीला ठप्प आहेत़ ग्रामीण, शहरी भागासाठी पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे़४गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात पाच बंधारे बांधले आहेत़ त्यापैकी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात सध्या २़४४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ मात्र या पाणीसाठ्यावर परभणीकरांचा हक्क नाही़ त्यामुळे पाणी असूनही हा बंधारा जिल्ह्यासाठी कोरडाच म्हणावा लागेल़ तर मुदगल ढालेगाव, मुळी या बंधाऱ्यातही पाणीसाठा शिल्लक नसल्याने बंधारा परिसरातील अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे़४दुष्काळाबरोबरच प्रशासकीय उदासिनतेचा फटका या बंधाऱ्यांना बसला आहे़ गंगाखेड तालुक्यात मुळी येथील बंधाºयाला दोन वर्षांपासून दरवाजे बसविले नाहीत़ त्यामुळे बंधाºयात पाणीसाठाच झाला नाही़ त्याचा फटका या परिसरातील शेतकºयांना सहन करावा लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी