शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

परभणी जिल्ह्यातील सात प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाची ख्याती असली तरी आज मात्र या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ मृतसाठ्यामध्ये १०२ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून दिली जात आहे़ परंतु, या मृतसाठ्यात गाळ किती याचा अंदाज नसल्याने १०२ दलघमी पैकी किती पाणी उपलब्ध होवू शकते़ हाही प्रश्नच आहे़ मागील वर्षीच्या उन्हाळ्यात परभणीसह ४ तालुक्यांना दिलासादायक ठरलेला निम्न दूधना प्रकल्प यावर्षी कोरडा पडला आहे़ या प्रकल्पातही जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ विशेष म्हणजे मागील वर्षी एप्रिल महिन्यात या प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़सद्यस्थितीला मृतसाठ्यामध्ये ९३़२०० दलघमी पाणी शिल्लक आहे़ हे पाणी सेलू शहरासह तालुक्यातील इतर गावांसाठीच वापरावे लागणार आहे़ परिणामी परभणी, पूर्णा या दोन तालुक्यांना पाण्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे़जिंतूर तालुक्यात करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ०़६९३ (३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे तर गंगाखेडच्या मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही़ त्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे़ याशिवाय जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प आहेत़ परंतु, एकाही प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या कचाट्यात सापडला आहे़ या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीला ठप्प आहेत़ ग्रामीण, शहरी भागासाठी पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे़४गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात पाच बंधारे बांधले आहेत़ त्यापैकी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात सध्या २़४४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ मात्र या पाणीसाठ्यावर परभणीकरांचा हक्क नाही़ त्यामुळे पाणी असूनही हा बंधारा जिल्ह्यासाठी कोरडाच म्हणावा लागेल़ तर मुदगल ढालेगाव, मुळी या बंधाऱ्यातही पाणीसाठा शिल्लक नसल्याने बंधारा परिसरातील अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे़४दुष्काळाबरोबरच प्रशासकीय उदासिनतेचा फटका या बंधाऱ्यांना बसला आहे़ गंगाखेड तालुक्यात मुळी येथील बंधाºयाला दोन वर्षांपासून दरवाजे बसविले नाहीत़ त्यामुळे बंधाºयात पाणीसाठाच झाला नाही़ त्याचा फटका या परिसरातील शेतकºयांना सहन करावा लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी