शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

२८ वर्षांपासून सेलूकरांना आगाराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:11 IST

सेलू तालुक्याची लोकसंख्या जवळपास १ लाख ६५ हजारांच्या घरात आहे.यामध्ये ९५ गावांचा समावेश आहे. तसेच येथील शैक्षणिक, व्यापार व ...

सेलू तालुक्याची लोकसंख्या जवळपास १ लाख ६५ हजारांच्या घरात आहे.यामध्ये ९५ गावांचा समावेश आहे. तसेच येथील शैक्षणिक, व्यापार व दळणवळणाची परिस्थिती पाहता पाथरी आगाराकडून होणारी बससेवा सातत्याने कोलमडत आहे. वालूर, सातोना, आष्टी, देऊळगाव गात, डासाळा, वजळा, पाथरी, परभणी या मार्गावरील बस नियोजन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. प्रवाशांना दोन तास बसच्या प्रतीक्षेसाठी ताटकळत बसावे लागते. मागील आठवड्यात पिंप्रुळा व राजवाडी या दोन ठिकाणी विद्यार्थ्यांची बस रोखून धरली होती. सेलू तालुक्यातील बससेवेचे काम पाथरी आगारातून पाहिले जाते. त्याचबरोबर पाथरी आगारातून नेहमीच सेलूसाठी अपेक्षित बस पाठविल्या जात नाहीत. शिवाय नादुरुस्त बस या सेलूकरांच्या माथी मारल्या जातात. त्यामुळे सेलूकरांना पाथरी आगाराकडून सापत्न वागणूक मिळत आहे. शैक्षणिक, व्यापार व दळणवळणाचा विचार करून सेलू येथे बस आगार होणे गरजेचे आहे. सेलूकरांची या आगरासाठी मागील अनेक दिवसांपासून विशेषत:या आगारासाठी सर्व भौतिक सुविधा बसस्थानक परिसरात अनुकूल आहेत. त्यामुळे तातडीने पावले उचलत परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाने सेलू येथे आगारासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मागील २८ वर्षांपासून सेलूकरांना प्रतीक्षा असलेल्या बस आगाराची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

१५ गावांत पोहोचलीच नाही बस

सेलू तालुक्यात सोन्ना, बोरगाव, सेलवाडी, गणेशपूर, बोरकिनी, गीरगाव, माले टाकळी, म्हाळसापूर, गोहेगाव, गुळखंड, सिमणगाव, आडगाव, निरवाडी, सावंगी या पंधरा गावात अद्यापही बस पोहोचली नाही. त्यामुळे सेलू येथे बस आगाराची निर्मिती झाल्यास या गावांमध्ये बस पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पादनात भर पडू शकते.

विद्यार्थ्यासाठी बस ठरतेय गैरसोयीची

सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी व विद्यार्थिनी दहावीपासून ते उच्च शिक्षण घेण्यासाठी सेलू शहराकडे धाव घेतात. परंतु, विद्यार्थी व विद्यार्थिनींची ये-जा करण्याची मदार ही बसवर अवलंबून आहे. मात्र पाथरी आगारातून सेलू येथील बसचे नियोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. अनेक वेळा निपाणी टाकळी, पिंप्रुळा, राजवाडी यासह आदी गावांतील विद्यार्थ्यांना बस रोखून धराव्या लागल्या आहेत.