शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

चिखलात लोळा की गाव विका; रस्त्यासाठी प्रशासनाची सुस्ती, माहेरवासीयांच्या यातना कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 12:39 IST

पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला जोडणारा तीन किमीच्या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल तयार झाला आहे.

- मारोती जुंबडेपरभणी : पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला रस्ता मिळावा, यासाठी ग्रामस्थ २३ सप्टेंबरपासून आंदोलन करत आहेत. यात पहिल्या दिवशी गाव विक्रीला काढण्यात आले. त्यानंतर थाळ्या वाजवल्या, अर्धनग्न आंदोलनही झाले. बुधवारी तर चक्क ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाचा निषेध करत चिखलात लोटांगण घातले. मात्र, तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून जमिनीत लोळा की गाव विका आम्ही तुमच्या समस्या सोडविण्यास बांधील नसल्याचा संदेश देण्यात येत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा महामार्गावर खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागातील रस्ते चक्क पाणंद रस्ते बनलेत. अशातच पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला जोडणारा तीन किमीच्या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल तयार झाला आहे. या चिखलातून रस्ता काढत पूर्णा व परभणी शहर गाठण्यासाठी ग्रामस्थांना कसोशीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ सप्टेंबरला तहसील व जिल्हा प्रशासनाला एक निवेदन देऊन चक्क बोलीद्वारे गावच विक्री काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तरी प्रशासन जागे होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गावात धडकेल आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेईल, अशी अपेक्षा होती.

मात्र, प्रशासन वेळेत कोणत्याही समस्यांची दखल घेईल, असे परभणी जिल्ह्यात क्वचित पाहावयास मिळते. तर दुसरीकडे ५०० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये २०० ते २५० मतदार असतील, त्यामुळे या मतदारांनी मतदान केले काय? आणि नाही केले काय? याच विचाराने लोकप्रतिनिधीही त्या गावातील ग्रामस्थांच्या समस्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यास पुढे येत नसतील. त्यामुळेच माहेर ग्रामस्थांना तुम्ही जमिनीवर लोळा की गाव विका आम्ही मात्र तुमच्या समस्या सोडविण्यास बांधील नसल्याचा संदेश प्रशासन व लोकप्रतिनिधींतून दिला जातो की काय? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.

जिल्ह्यासाठी भूषणावह नाहीमाहेर ग्रामस्थांनी रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी सहा दिवसांपूर्वी गाव विक्रीला काढण्याचे निवेदन प्रशासनाला दिले. मात्र, तरीही प्रशासनाने या गावच्या ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे केवळ रस्त्यासाठी गाव विक्री काढणे, हे जिल्ह्यासाठी तरी भूषणावह नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा