शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चिखलात लोळा की गाव विका; रस्त्यासाठी प्रशासनाची सुस्ती, माहेरवासीयांच्या यातना कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 12:39 IST

पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला जोडणारा तीन किमीच्या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल तयार झाला आहे.

- मारोती जुंबडेपरभणी : पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला रस्ता मिळावा, यासाठी ग्रामस्थ २३ सप्टेंबरपासून आंदोलन करत आहेत. यात पहिल्या दिवशी गाव विक्रीला काढण्यात आले. त्यानंतर थाळ्या वाजवल्या, अर्धनग्न आंदोलनही झाले. बुधवारी तर चक्क ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाचा निषेध करत चिखलात लोटांगण घातले. मात्र, तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून जमिनीत लोळा की गाव विका आम्ही तुमच्या समस्या सोडविण्यास बांधील नसल्याचा संदेश देण्यात येत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा महामार्गावर खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागातील रस्ते चक्क पाणंद रस्ते बनलेत. अशातच पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला जोडणारा तीन किमीच्या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल तयार झाला आहे. या चिखलातून रस्ता काढत पूर्णा व परभणी शहर गाठण्यासाठी ग्रामस्थांना कसोशीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ सप्टेंबरला तहसील व जिल्हा प्रशासनाला एक निवेदन देऊन चक्क बोलीद्वारे गावच विक्री काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तरी प्रशासन जागे होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गावात धडकेल आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेईल, अशी अपेक्षा होती.

मात्र, प्रशासन वेळेत कोणत्याही समस्यांची दखल घेईल, असे परभणी जिल्ह्यात क्वचित पाहावयास मिळते. तर दुसरीकडे ५०० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये २०० ते २५० मतदार असतील, त्यामुळे या मतदारांनी मतदान केले काय? आणि नाही केले काय? याच विचाराने लोकप्रतिनिधीही त्या गावातील ग्रामस्थांच्या समस्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यास पुढे येत नसतील. त्यामुळेच माहेर ग्रामस्थांना तुम्ही जमिनीवर लोळा की गाव विका आम्ही मात्र तुमच्या समस्या सोडविण्यास बांधील नसल्याचा संदेश प्रशासन व लोकप्रतिनिधींतून दिला जातो की काय? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.

जिल्ह्यासाठी भूषणावह नाहीमाहेर ग्रामस्थांनी रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी सहा दिवसांपूर्वी गाव विक्रीला काढण्याचे निवेदन प्रशासनाला दिले. मात्र, तरीही प्रशासनाने या गावच्या ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे केवळ रस्त्यासाठी गाव विक्री काढणे, हे जिल्ह्यासाठी तरी भूषणावह नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा