शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संभाव्य पॅनलप्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित ...

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित झाले आहेत. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत निवडणुकीत स्थलांतरित मतदारांच्या शोधात पॅनलप्रमुख लागले आहेत.

जिंतूर तालुक्यात १७० गावे असून, ४७ तांडे व जवळपास ३० वाडी-वस्त्या आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेती हेच असल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील मजूर कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, नागपूर, सुरत या भागांमध्ये जातात. तालुक्यातील जवळपास २९ हजार मजूर कामासाठी बाहेरगावी होते; परंतु ८ महिन्यांत कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे मजूर गावी परतले होते; परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे मजूर परत ऊसतोड व कामाच्या शोधात महानगरात परतले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक लागल्याने त्यांना मतदान करण्यासाठी मूळ गावी यावे लागणार आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार या सर्कलमध्ये जवळपास १३ तांडे असून, आडगाव तांडा, सरोज तांडा, भुसकवडी तांडा, मोहखेड तांडा आदी तांड्यांचा यात समावेश आहे. या तांड्यांवरील जवळपास ६ ते ७ हजार मजूर कामाच्या शोधासाठी बाहेरगावी गेले आहेत. चारठाणा सर्कलमध्ये १२ तांडे असून, यामध्ये गारखेडा तांडा, राजेगाव तांडा, जांब तांडा, सायखेडा यासह १२ ते १३ तांडे आहेत. या सर्कलमधून साधारणत: साडेतीन हजार ते ४ हजार मजूर महानगरात कामासाठी गेले आहेत. वझर सर्कलमध्ये १२ तांड्यांचा समावेश असून, या तांड्यांतून जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त मजूर बाहेरगावी आहेत. भोगाव सर्कलमध्ये घेवडा तांडा, पोखर्णी तांडा, खरदखी तांडा आदी ७ तांड्यांतून १ हजार मजूर बाहेरगावी गेले आहेत. सावंगी म्हाळसा सर्कलअंतर्गत ७ तांडे असून, या तांड्यांतील दीड ते दोन हजार कामगार बाहेरगावी आहेत. बोरी सर्कलमधून साधारणत: ३ हजार मजूर बाहेर असून हीच परस्थिती वस्सा, कौसडी, वरूड सर्कलची आहे. तालुक्यात जवळपास ३० वाडी- वस्त्या असून, यामधून ४ ते ५ हजार कामगार कामाच्या शोधात बाहेरगावी आहेत. त्यामुळे २९ हजार मजुरांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना परत आणण्यासाठी पॅनलप्रमुखांनी यंत्रणा कामाला लावली आहे.

स्थलांतरित मतदारांत अनेक संभाव्य उमेदवार

गावगाड्यात पॅनल तयार करताना उमेदवाराकडे असलेली मतांची संख्या लक्षात घेतली जाते. अनेक संभाव्य उमेदवार ऊसतोडीसाठी गेले असल्याने त्यांना तातडीने गावात परतण्यासाठी निरोप देण्यात आले आहेत. वाॅर्ड आरक्षण, मतांची संख्या व पॅनलप्रमुखावर असलेली निष्ठा यावरच ही निवडणूक अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.