शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य पॅनलप्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित ...

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित झाले आहेत. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत निवडणुकीत स्थलांतरित मतदारांच्या शोधात पॅनलप्रमुख लागले आहेत.

जिंतूर तालुक्यात १७० गावे असून, ४७ तांडे व जवळपास ३० वाडी-वस्त्या आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेती हेच असल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील मजूर कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, नागपूर, सुरत या भागांमध्ये जातात. तालुक्यातील जवळपास २९ हजार मजूर कामासाठी बाहेरगावी होते; परंतु ८ महिन्यांत कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे मजूर गावी परतले होते; परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे मजूर परत ऊसतोड व कामाच्या शोधात महानगरात परतले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक लागल्याने त्यांना मतदान करण्यासाठी मूळ गावी यावे लागणार आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार या सर्कलमध्ये जवळपास १३ तांडे असून, आडगाव तांडा, सरोज तांडा, भुसकवडी तांडा, मोहखेड तांडा आदी तांड्यांचा यात समावेश आहे. या तांड्यांवरील जवळपास ६ ते ७ हजार मजूर कामाच्या शोधासाठी बाहेरगावी गेले आहेत. चारठाणा सर्कलमध्ये १२ तांडे असून, यामध्ये गारखेडा तांडा, राजेगाव तांडा, जांब तांडा, सायखेडा यासह १२ ते १३ तांडे आहेत. या सर्कलमधून साधारणत: साडेतीन हजार ते ४ हजार मजूर महानगरात कामासाठी गेले आहेत. वझर सर्कलमध्ये १२ तांड्यांचा समावेश असून, या तांड्यांतून जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त मजूर बाहेरगावी आहेत. भोगाव सर्कलमध्ये घेवडा तांडा, पोखर्णी तांडा, खरदखी तांडा आदी ७ तांड्यांतून १ हजार मजूर बाहेरगावी गेले आहेत. सावंगी म्हाळसा सर्कलअंतर्गत ७ तांडे असून, या तांड्यांतील दीड ते दोन हजार कामगार बाहेरगावी आहेत. बोरी सर्कलमधून साधारणत: ३ हजार मजूर बाहेर असून हीच परस्थिती वस्सा, कौसडी, वरूड सर्कलची आहे. तालुक्यात जवळपास ३० वाडी- वस्त्या असून, यामधून ४ ते ५ हजार कामगार कामाच्या शोधात बाहेरगावी आहेत. त्यामुळे २९ हजार मजुरांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना परत आणण्यासाठी पॅनलप्रमुखांनी यंत्रणा कामाला लावली आहे.

स्थलांतरित मतदारांत अनेक संभाव्य उमेदवार

गावगाड्यात पॅनल तयार करताना उमेदवाराकडे असलेली मतांची संख्या लक्षात घेतली जाते. अनेक संभाव्य उमेदवार ऊसतोडीसाठी गेले असल्याने त्यांना तातडीने गावात परतण्यासाठी निरोप देण्यात आले आहेत. वाॅर्ड आरक्षण, मतांची संख्या व पॅनलप्रमुखावर असलेली निष्ठा यावरच ही निवडणूक अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.