शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

संभाव्य पॅनलप्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित ...

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित झाले आहेत. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत निवडणुकीत स्थलांतरित मतदारांच्या शोधात पॅनलप्रमुख लागले आहेत.

जिंतूर तालुक्यात १७० गावे असून, ४७ तांडे व जवळपास ३० वाडी-वस्त्या आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेती हेच असल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील मजूर कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, नागपूर, सुरत या भागांमध्ये जातात. तालुक्यातील जवळपास २९ हजार मजूर कामासाठी बाहेरगावी होते; परंतु ८ महिन्यांत कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे मजूर गावी परतले होते; परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे मजूर परत ऊसतोड व कामाच्या शोधात महानगरात परतले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक लागल्याने त्यांना मतदान करण्यासाठी मूळ गावी यावे लागणार आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार या सर्कलमध्ये जवळपास १३ तांडे असून, आडगाव तांडा, सरोज तांडा, भुसकवडी तांडा, मोहखेड तांडा आदी तांड्यांचा यात समावेश आहे. या तांड्यांवरील जवळपास ६ ते ७ हजार मजूर कामाच्या शोधासाठी बाहेरगावी गेले आहेत. चारठाणा सर्कलमध्ये १२ तांडे असून, यामध्ये गारखेडा तांडा, राजेगाव तांडा, जांब तांडा, सायखेडा यासह १२ ते १३ तांडे आहेत. या सर्कलमधून साधारणत: साडेतीन हजार ते ४ हजार मजूर महानगरात कामासाठी गेले आहेत. वझर सर्कलमध्ये १२ तांड्यांचा समावेश असून, या तांड्यांतून जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त मजूर बाहेरगावी आहेत. भोगाव सर्कलमध्ये घेवडा तांडा, पोखर्णी तांडा, खरदखी तांडा आदी ७ तांड्यांतून १ हजार मजूर बाहेरगावी गेले आहेत. सावंगी म्हाळसा सर्कलअंतर्गत ७ तांडे असून, या तांड्यांतील दीड ते दोन हजार कामगार बाहेरगावी आहेत. बोरी सर्कलमधून साधारणत: ३ हजार मजूर बाहेर असून हीच परस्थिती वस्सा, कौसडी, वरूड सर्कलची आहे. तालुक्यात जवळपास ३० वाडी- वस्त्या असून, यामधून ४ ते ५ हजार कामगार कामाच्या शोधात बाहेरगावी आहेत. त्यामुळे २९ हजार मजुरांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना परत आणण्यासाठी पॅनलप्रमुखांनी यंत्रणा कामाला लावली आहे.

स्थलांतरित मतदारांत अनेक संभाव्य उमेदवार

गावगाड्यात पॅनल तयार करताना उमेदवाराकडे असलेली मतांची संख्या लक्षात घेतली जाते. अनेक संभाव्य उमेदवार ऊसतोडीसाठी गेले असल्याने त्यांना तातडीने गावात परतण्यासाठी निरोप देण्यात आले आहेत. वाॅर्ड आरक्षण, मतांची संख्या व पॅनलप्रमुखावर असलेली निष्ठा यावरच ही निवडणूक अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.