शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

By मारोती जुंबडे | Updated: January 5, 2023 13:56 IST

जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे.

- मारोती जुंबडेपरभणी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गास जालना ते नांदेड हा महामार्ग जोडला जाणार असल्यामुळे या दोन शहरातील २२६ किलोमीटरचे अंतर ४७ किमीने कमी होऊन १७९.८ किलोमीटर एवढे राहणार आहे. तसेच नांदेड ते मुंबई दरम्यानचा १२ तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे.

परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे.जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. या जालना- नांदेड द्रुतगती मार्गाच्या १७९ किलोमीटरसाठी तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांमधील ८८ गावांतून संबंधित मार्ग जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ९४५ गटातून या मार्गाची सिमेंटने बांधणी केली जाणार आहे. यासाठी दाेन हजार २०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ७३७ हेक्टर क्षेत्र हे खासगी जमिनीचे संपादित होणार आहे. त्यासाठी तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून २,२०० कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

यात जालना जिल्ह्यातील २९ गावातून हा मार्ग जाणार असून ६१८ हेक्टर खासगी जमीन संपादित होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४९३ कोटींची अंदाजित रकमेची मागणी नोंदविली आहे. विशेष म्हणजे, या भूसंपादनासाठी मार्च २०२३ पर्यंत २४७ कोटींचा निधी लागणार असल्याचेही यात म्हटले आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा मार्ग जात असून यासाठी ९२२ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ९०७ कोटींची मागणी नोंदविली आहे. मार्च २०२३ पर्यंत ४५३ कोटी रुपयांच्या रकमेची आवश्यकता आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १२ गावातून हा मार्ग जाणारा असून या जिल्ह्यातील १८५ हेक्टर क्षेत्राचे संपादन केले जाणार आहे. त्यासाठी ८०० कोटींची मागणी नोंदवली असून भूसंपादनासाठी मार्चपर्यंत लागणारा पन्नास टक्के म्हणजे ४०० कोटींची मागणी नोंदविले आहे. त्यामुळे लवकरच या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे.

सर्वाधिक लाभ परभणीलाजालना- नांदेड या द्रुतगती महामार्गाचा सर्वाधिक लाभ परभणी जिल्ह्याला होणार आहे. जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा महामार्ग ९३.५२ किमीचा आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातून ६६.४६ किमी जाणारा असून २९ गावांना लाभ होणार आहे. तर त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १९.८२ किलोमीटर अंतराचा असून १२ गावांतून जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक लाभ हा परभणी जिल्ह्याला होणार आहे.

असा असणार महामार्गलांबी......१७९.८ किमीमोठे पूल......०७रेल्वे ओलांडणी पूल.....०२इंटरचेंजेस.......०८अंडरपास.....१८भूसंपादनाचे क्षेत्र.....२,२०० हेक्टरप्रकल्पाची किंमत....१४ हजार ५०० कोटी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाparabhaniपरभणीNandedनांदेड