शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

By मारोती जुंबडे | Updated: January 5, 2023 13:56 IST

जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे.

- मारोती जुंबडेपरभणी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गास जालना ते नांदेड हा महामार्ग जोडला जाणार असल्यामुळे या दोन शहरातील २२६ किलोमीटरचे अंतर ४७ किमीने कमी होऊन १७९.८ किलोमीटर एवढे राहणार आहे. तसेच नांदेड ते मुंबई दरम्यानचा १२ तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे.

परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे.जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. या जालना- नांदेड द्रुतगती मार्गाच्या १७९ किलोमीटरसाठी तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांमधील ८८ गावांतून संबंधित मार्ग जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ९४५ गटातून या मार्गाची सिमेंटने बांधणी केली जाणार आहे. यासाठी दाेन हजार २०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ७३७ हेक्टर क्षेत्र हे खासगी जमिनीचे संपादित होणार आहे. त्यासाठी तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून २,२०० कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

यात जालना जिल्ह्यातील २९ गावातून हा मार्ग जाणार असून ६१८ हेक्टर खासगी जमीन संपादित होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४९३ कोटींची अंदाजित रकमेची मागणी नोंदविली आहे. विशेष म्हणजे, या भूसंपादनासाठी मार्च २०२३ पर्यंत २४७ कोटींचा निधी लागणार असल्याचेही यात म्हटले आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा मार्ग जात असून यासाठी ९२२ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ९०७ कोटींची मागणी नोंदविली आहे. मार्च २०२३ पर्यंत ४५३ कोटी रुपयांच्या रकमेची आवश्यकता आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १२ गावातून हा मार्ग जाणारा असून या जिल्ह्यातील १८५ हेक्टर क्षेत्राचे संपादन केले जाणार आहे. त्यासाठी ८०० कोटींची मागणी नोंदवली असून भूसंपादनासाठी मार्चपर्यंत लागणारा पन्नास टक्के म्हणजे ४०० कोटींची मागणी नोंदविले आहे. त्यामुळे लवकरच या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे.

सर्वाधिक लाभ परभणीलाजालना- नांदेड या द्रुतगती महामार्गाचा सर्वाधिक लाभ परभणी जिल्ह्याला होणार आहे. जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा महामार्ग ९३.५२ किमीचा आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातून ६६.४६ किमी जाणारा असून २९ गावांना लाभ होणार आहे. तर त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १९.८२ किलोमीटर अंतराचा असून १२ गावांतून जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक लाभ हा परभणी जिल्ह्याला होणार आहे.

असा असणार महामार्गलांबी......१७९.८ किमीमोठे पूल......०७रेल्वे ओलांडणी पूल.....०२इंटरचेंजेस.......०८अंडरपास.....१८भूसंपादनाचे क्षेत्र.....२,२०० हेक्टरप्रकल्पाची किंमत....१४ हजार ५०० कोटी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाparabhaniपरभणीNandedनांदेड