शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

By मारोती जुंबडे | Updated: January 5, 2023 13:56 IST

जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे.

- मारोती जुंबडेपरभणी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गास जालना ते नांदेड हा महामार्ग जोडला जाणार असल्यामुळे या दोन शहरातील २२६ किलोमीटरचे अंतर ४७ किमीने कमी होऊन १७९.८ किलोमीटर एवढे राहणार आहे. तसेच नांदेड ते मुंबई दरम्यानचा १२ तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे.

परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे.जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. या जालना- नांदेड द्रुतगती मार्गाच्या १७९ किलोमीटरसाठी तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांमधील ८८ गावांतून संबंधित मार्ग जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ९४५ गटातून या मार्गाची सिमेंटने बांधणी केली जाणार आहे. यासाठी दाेन हजार २०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ७३७ हेक्टर क्षेत्र हे खासगी जमिनीचे संपादित होणार आहे. त्यासाठी तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून २,२०० कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

यात जालना जिल्ह्यातील २९ गावातून हा मार्ग जाणार असून ६१८ हेक्टर खासगी जमीन संपादित होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४९३ कोटींची अंदाजित रकमेची मागणी नोंदविली आहे. विशेष म्हणजे, या भूसंपादनासाठी मार्च २०२३ पर्यंत २४७ कोटींचा निधी लागणार असल्याचेही यात म्हटले आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा मार्ग जात असून यासाठी ९२२ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ९०७ कोटींची मागणी नोंदविली आहे. मार्च २०२३ पर्यंत ४५३ कोटी रुपयांच्या रकमेची आवश्यकता आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १२ गावातून हा मार्ग जाणारा असून या जिल्ह्यातील १८५ हेक्टर क्षेत्राचे संपादन केले जाणार आहे. त्यासाठी ८०० कोटींची मागणी नोंदवली असून भूसंपादनासाठी मार्चपर्यंत लागणारा पन्नास टक्के म्हणजे ४०० कोटींची मागणी नोंदविले आहे. त्यामुळे लवकरच या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे.

सर्वाधिक लाभ परभणीलाजालना- नांदेड या द्रुतगती महामार्गाचा सर्वाधिक लाभ परभणी जिल्ह्याला होणार आहे. जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा महामार्ग ९३.५२ किमीचा आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातून ६६.४६ किमी जाणारा असून २९ गावांना लाभ होणार आहे. तर त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १९.८२ किलोमीटर अंतराचा असून १२ गावांतून जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक लाभ हा परभणी जिल्ह्याला होणार आहे.

असा असणार महामार्गलांबी......१७९.८ किमीमोठे पूल......०७रेल्वे ओलांडणी पूल.....०२इंटरचेंजेस.......०८अंडरपास.....१८भूसंपादनाचे क्षेत्र.....२,२०० हेक्टरप्रकल्पाची किंमत....१४ हजार ५०० कोटी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाparabhaniपरभणीNandedनांदेड