शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिद्दीला सलाम ! पुराच्या पाण्यातून प्रवास करीत वाटले ‘लोकमत’चे अंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 16:52 IST

Flood In Parabhani : गोदावरी नदीला पूर आला की या पुराच्या बॅक वॉटरचे पाणी खळी गावाच्या बाजूला असलेल्या ओढ्यात येते. परिणामी ओढ्याला पूर येतो.

परभणी : गावाशेजारच्या ओढ्याला पूर आल्याने ( Flood In Parabhani ) तराफ्याच्या साह्याने पूर पार करून २ कि.मी. अंतरावरून ‘लोकमत’चे ( Lokmat ) अंक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडसी काम गंगाखेड तालुक्यातील खळी येथील वितरक प्रदीप गौरशेटे यांनी बुधवारी केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खळी हे ४ हजार लोकसंख्येचे गोदावरी नदी काठावरील गाव आहे. गोदावरी नदीला पूर आला की या पुराच्या बॅक वॉटरचे पाणी खळी गावाच्या बाजूला असलेल्या ओढ्यात येते. परिणामी ओढ्याला पूर येतो. त्यामुळे खळी गाव ते गंगाखेड शहराचा संपर्क तुटतो. ही गेल्या अनेक वर्षांपासून खळी ग्रामस्थांसाठी नित्याची बाब आहे. २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. शिवाय गोदावरी नदी परिक्षेत्रातही अतिवृष्टी झाली. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने पुन्हा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला. त्यामुळे गावातील दळणवळण ठप्प झाले. 

या परिस्थितही गावातील वाचकांशी असलेली बांधिलकी जपत खळी येथील ‘लोकमत’चे वितरक प्रदीप त्र्यंबकअप्पा गौरशेट्टे यांनी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता नावेच्या साह्याने ओढ्यावरील पूर पार करून पुढे २ किमीचे अंतर चालत जाऊन गंगाखेड रस्त्यावरील खळी पाटी येथून ‘लोकमत’च्या अंकाचे पार्सल घेतले. त्यानंतर लोकमतचे अंक घेऊन परत २ कि.मी.चा तराफ्याने प्रवास करुन गावात अंकाचे वाटप केले. प्रदीप गौरशेटे हे मागील पाच वर्षांपासून ‘लोकमत’चे वितरक आहेत. त्यांच्याकडे एकूण १० अंक आहेत. या वर्षी पावसाळ्यात तीन वेळा त्यांना असा धोकादायक प्रवास करावा लागला.

हेही वाचा - जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरले; अठरा दरवाज्यातून ९४३२ क्युसेकने गोदापात्रात विसर्ग

टॅग्स :parabhaniपरभणीLokmatलोकमतRajendra Dardaराजेंद्र दर्डाfloodपूरRainपाऊस