शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून परस्पर ५० हजार रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

पाथरी : पाथरी शहरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यातील ५० हजार रुपये औरंगाबाद येथील दोन एटीएममधून ...

पाथरी : पाथरी शहरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यातील ५० हजार रुपये औरंगाबाद येथील दोन एटीएममधून परस्पर काढत आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने २६ डिसेंबर रोजी पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

पाथरी शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या व सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे कार्यरत असलेल्या जयश्री सुभाष नाईक असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री नाईक यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली येथील स्वतःच्या खात्यातील ९ हजार ५०० रुपये पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात असणाऱ्या एटीएममधून १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काढले होते. यानंतर १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात असणाऱ्या एटीएममधून अज्ञात व्यक्तीकडून सकाळी ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान तीनवेळा प्रत्येकी दहा हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली. यानंतर १३ डिसेंबर रोजी पुन्हा औरंगाबाद येथील जवाहर कॉलनी परिसरात असलेल्या एटीएममधून सकाळी ८.१५ ते ८.३० वाजेदरम्यान २० हजार रुपये काढण्यात आले. यासंदर्भात सदरील महिलेला मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर माहिती कळाली. तोपर्यंत अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या खात्यातून सुमारे ५० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे, या महिलेचे एटीएम कार्ड या दरम्यान तिच्या जवळच होते व कोणीही कॉल करत ओटीपीसंदर्भात विचारणा केलेली नव्हती. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदरील महिलेने यासंदर्भात हिंगोली येथील बँक प्रशासनाकडे पैसे कपात झाल्याबद्दल विचारणा करत लेखी तक्रारही दिली होती. दरम्यान, या खात्याचे एटीएम ब्लॉक केले होते. यानंतरही २२ डिसेंबर रोजी ३ वाजेच्या सुमारास पुन्हा अज्ञात व्यक्तीने खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचा मेसेज आल्यानंतर सदरील महिलेने यासंदर्भात पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत.