शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

शहरातील रस्ते बनले चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST

गहू, ज्वारी, आंब्याचे मोठे नुकसान परभणी : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी या पिकांसह आंब्याचे मोठ्या ...

गहू, ज्वारी, आंब्याचे मोठे नुकसान

परभणी : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी या पिकांसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले असून, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक विस्कळीत

परभणी : येथील गंगाखेड रोड भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या भागात एका बाजूने सिमेंट कॉंक्रीट रस्ता तयार करण्यात आला असून, दुसऱ्या बाजूने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. शहर हद्दीतील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

कोरोनाच्या अहवालांना विलंब

परभणी : जिल्ह्यात आरोग्य विभागाने तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली असली तरी प्रत्यक्षात त्याचे अहवाल वेळेत प्राप्त होत नाहीत. त्यामुळे स्वॅब नमुना दिलेल्या नागरिकांना अहवालासाठी तीन ते चार दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. मात्र, त्या प्रमाणात प्रयोगशाळेतून अहवाल देण्याची गतीही वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहर स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष

परभणी : शहरात मागील काही दिवसांपासून मनपा प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्य प्रभागांमध्ये नाल्या तुंबल्या असून, जागोजागी घाण साचली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर प्रशासनाने कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.

शहरातील बसपोर्टचे काम संथगतीने सुरू

परभणी : शहरातील बसस्थानक परिसरात बसपोर्ट उभारण्याचे काम अनेक दिवसांनंतर सुरू झाले आहे; परंतु या कामाला अजूनही गती प्राप्त झाली नाही. एसटी महामंडळ प्रशासनाने बसपोर्टच्या कामासाठी निधी उपलब्ध करून कामाला गती प्राप्त करून द्यावी. मुदतीत हे काम पूर्ण करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास

परभणी : धर्माबाद-मनमाड या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत आहेत. परभणी, सेलू, पूर्णा या स्थानकांवर तिकीट तपासणीस उपलब्ध नसल्याने या प्रवाशांचे फावत आहे. कमी अंतराचा प्रवास करताना रेल्वेने तिकीट आरक्षण करून प्रवास करणे परवडत नसल्याने काही प्रवाशांनी हा मधला मार्ग निवडला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.