शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

रस्ते ठप्प; घरांची पडझड अन् पिके बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST

१८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प अतिवृष्टीने जिल्ह्यातील १८ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परभणी-सेलू रस्त्यावर ढेंगळी पिंपळगाव येथे पुलावरून पाणी ...

१८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प

अतिवृष्टीने जिल्ह्यातील १८ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परभणी-सेलू रस्त्यावर ढेंगळी पिंपळगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच वालूर-मानवत, पाथरी तालुक्यातील पाथरी-सेलू, पाथरी-सोनपेठ, पाथरी-पोखर्णी, पाथरी-आष्टी, पाथरी-परभणी, पालम तालुक्यात परभणी-पालम, पालम-जांभूळबेट, केरवाडी-सायाळा, पूर्णा तालुक्यात पिंगळगड नदीला पूर आल्याने पूर्णा-ताडकळस, पूर्णा नदीला पूर आल्याने पूर्णा-परभणी, मानवत तालुक्यातील परभणी-मानवत या राष्ट्रीय महामार्गावर ताडबोरगावजवळ ओढ्याला पूर आल्याने मानवत-परभणी, सोनपेठ तालुक्यात शेळगाव-उक्कलगाव, गंगाखेड तालुक्यात गंगाखेड ते परभणी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर-परभणी, जिंतूर-पाचलेगाव या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.

गोदावरी, पूर्णा दुथडी

अतिवृष्टीमुळे गोदावरी आणि पूर्णा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील कंठेश्वर येथे गोदावरी नदीत इतर नद्या मिसळत असल्याने पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्णा नदी ६ मीटरने वाहत आहे.

या प्रकल्पांचे उघडले दरवाजे

सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाऱ्याचे १३ पैकी १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ३, मुदगल व तारुगव्हाण बंधाऱ्याचे प्रत्येकी २ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. पाथरी तालुक्यातील तिन्ही बंधाऱ्यांमध्ये मिळून ६८ हजार २५० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

३२ गावांचा तुटला संपर्क

जिंतूर तालुक्यातील पाचलेगावात पुराचे पाणी शिरले असून, १४ तासांपासून गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच सेलू तालुक्यातील कुपटा, पालम तालुक्यातील १० गावे, सोनपेठ तालुक्यातील ७ गावे, गंगाखेड तालुक्यातील ७, जिंतूर तालुक्यातील १३ गावांचा संपर्क तुटला होता.