शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रिक्षाचालकांचे कधी राइट, तर कधी लेफ्ट; प्रवाशांचा वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये ...

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी बिनधास्तपणे ऑटोरिक्षा रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे तर निर्माण होतातच, शिवाय अपघात होण्याची भीतीही निर्माण होत आहे. अनेक वेळा विरुद्ध दिशेला सर्रास ऑटोरिक्षा वळविले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. जनता मार्केट, गुजरी बाजार, शनिवार बाजार, गांधी पार्क या परिसरात हा प्रकार नित्याचा झाला आहे.

बसस्थानक

या परिरात बसस्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी कुठेही ऑटोरिक्षा उभे केले जात आहेत. मुख्य रस्त्यावर ऑटोरिक्षा उभे करण्यात येत असून, अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानकातही ऑटोरिक्षाचा पॉइंट असताना प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभी केली जाते. त्यामुळे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडताना ऑटोरिक्षाचा अडथळा पार करावा लागत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

जनता मार्केट

शहरातील जनता मार्केट भागात रस्ता अरुंद असून, अनेक ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. याच भागात ऑटोरिक्षा उभे करून प्रवासी मिळविले जात आहेत. त्यामुळे एकच गर्दी होते. अनेक वेळा वाहतूकही ठप्प होते. त्याचा त्रास इतर वाहनधारकांना होत आहे.

रिक्षा भाड्यात वाढ

मागील वर्षभरात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे.

बसस्थानकापासून शहरातील विविध भागांत प्रवाशांना सोडविण्यासाठी पूर्वी असलेल्या दरामध्ये ५ ते १० रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे हे दर निश्चित नाहीत.

त्यामुळे ठरावीक चौकापर्यंतचे दर निश्चित असले तरी चौकातून वसाहतीमध्ये घरापर्यंत सोडण्यासाठी मात्र रिक्षाचालकांच्या मनाचे भाडे आकारले जाते.

वाहतुकीला अडथळा

शहरात वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. सर्वसाधारण वाहनधारकांबरोबरच ऑटोरिक्षा चालकही अनेक वेळा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत.

प्रवासी मिळविण्यासाठी अनेक वेळा चढाओढ होते. वाटेतून एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की सर्रास त्याच ठिकाणावरून ऑटोरिक्षा वळविला जातो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

- अरुण पवार