शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

रिक्षाचालकांचे कधी राइट, तर कधी लेफ्ट; प्रवाशांचा वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये ...

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी बिनधास्तपणे ऑटोरिक्षा रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे तर निर्माण होतातच, शिवाय अपघात होण्याची भीतीही निर्माण होत आहे. अनेक वेळा विरुद्ध दिशेला सर्रास ऑटोरिक्षा वळविले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. जनता मार्केट, गुजरी बाजार, शनिवार बाजार, गांधी पार्क या परिसरात हा प्रकार नित्याचा झाला आहे.

बसस्थानक

या परिरात बसस्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी कुठेही ऑटोरिक्षा उभे केले जात आहेत. मुख्य रस्त्यावर ऑटोरिक्षा उभे करण्यात येत असून, अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानकातही ऑटोरिक्षाचा पॉइंट असताना प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभी केली जाते. त्यामुळे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडताना ऑटोरिक्षाचा अडथळा पार करावा लागत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

जनता मार्केट

शहरातील जनता मार्केट भागात रस्ता अरुंद असून, अनेक ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. याच भागात ऑटोरिक्षा उभे करून प्रवासी मिळविले जात आहेत. त्यामुळे एकच गर्दी होते. अनेक वेळा वाहतूकही ठप्प होते. त्याचा त्रास इतर वाहनधारकांना होत आहे.

रिक्षा भाड्यात वाढ

मागील वर्षभरात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे.

बसस्थानकापासून शहरातील विविध भागांत प्रवाशांना सोडविण्यासाठी पूर्वी असलेल्या दरामध्ये ५ ते १० रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे हे दर निश्चित नाहीत.

त्यामुळे ठरावीक चौकापर्यंतचे दर निश्चित असले तरी चौकातून वसाहतीमध्ये घरापर्यंत सोडण्यासाठी मात्र रिक्षाचालकांच्या मनाचे भाडे आकारले जाते.

वाहतुकीला अडथळा

शहरात वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. सर्वसाधारण वाहनधारकांबरोबरच ऑटोरिक्षा चालकही अनेक वेळा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत.

प्रवासी मिळविण्यासाठी अनेक वेळा चढाओढ होते. वाटेतून एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की सर्रास त्याच ठिकाणावरून ऑटोरिक्षा वळविला जातो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

- अरुण पवार