शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचे कधी राइट, तर कधी लेफ्ट; प्रवाशांचा वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये ...

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी बिनधास्तपणे ऑटोरिक्षा रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे तर निर्माण होतातच, शिवाय अपघात होण्याची भीतीही निर्माण होत आहे. अनेक वेळा विरुद्ध दिशेला सर्रास ऑटोरिक्षा वळविले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. जनता मार्केट, गुजरी बाजार, शनिवार बाजार, गांधी पार्क या परिसरात हा प्रकार नित्याचा झाला आहे.

बसस्थानक

या परिरात बसस्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी कुठेही ऑटोरिक्षा उभे केले जात आहेत. मुख्य रस्त्यावर ऑटोरिक्षा उभे करण्यात येत असून, अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानकातही ऑटोरिक्षाचा पॉइंट असताना प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभी केली जाते. त्यामुळे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडताना ऑटोरिक्षाचा अडथळा पार करावा लागत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

जनता मार्केट

शहरातील जनता मार्केट भागात रस्ता अरुंद असून, अनेक ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. याच भागात ऑटोरिक्षा उभे करून प्रवासी मिळविले जात आहेत. त्यामुळे एकच गर्दी होते. अनेक वेळा वाहतूकही ठप्प होते. त्याचा त्रास इतर वाहनधारकांना होत आहे.

रिक्षा भाड्यात वाढ

मागील वर्षभरात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे.

बसस्थानकापासून शहरातील विविध भागांत प्रवाशांना सोडविण्यासाठी पूर्वी असलेल्या दरामध्ये ५ ते १० रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे हे दर निश्चित नाहीत.

त्यामुळे ठरावीक चौकापर्यंतचे दर निश्चित असले तरी चौकातून वसाहतीमध्ये घरापर्यंत सोडण्यासाठी मात्र रिक्षाचालकांच्या मनाचे भाडे आकारले जाते.

वाहतुकीला अडथळा

शहरात वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. सर्वसाधारण वाहनधारकांबरोबरच ऑटोरिक्षा चालकही अनेक वेळा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत.

प्रवासी मिळविण्यासाठी अनेक वेळा चढाओढ होते. वाटेतून एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की सर्रास त्याच ठिकाणावरून ऑटोरिक्षा वळविला जातो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

- अरुण पवार