शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

रिक्षाचालकांचे कधी राइट, तर कधी लेफ्ट; प्रवाशांचा वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये ...

शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही भागांत ऑटोरिक्षांचे पॉइंट लावले असून, या पॉइंटवरून किंवा पॉइंटच्या समोर चौकांमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी बिनधास्तपणे ऑटोरिक्षा रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे तर निर्माण होतातच, शिवाय अपघात होण्याची भीतीही निर्माण होत आहे. अनेक वेळा विरुद्ध दिशेला सर्रास ऑटोरिक्षा वळविले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. जनता मार्केट, गुजरी बाजार, शनिवार बाजार, गांधी पार्क या परिसरात हा प्रकार नित्याचा झाला आहे.

बसस्थानक

या परिरात बसस्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी कुठेही ऑटोरिक्षा उभे केले जात आहेत. मुख्य रस्त्यावर ऑटोरिक्षा उभे करण्यात येत असून, अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानकातही ऑटोरिक्षाचा पॉइंट असताना प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभी केली जाते. त्यामुळे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडताना ऑटोरिक्षाचा अडथळा पार करावा लागत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

जनता मार्केट

शहरातील जनता मार्केट भागात रस्ता अरुंद असून, अनेक ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. याच भागात ऑटोरिक्षा उभे करून प्रवासी मिळविले जात आहेत. त्यामुळे एकच गर्दी होते. अनेक वेळा वाहतूकही ठप्प होते. त्याचा त्रास इतर वाहनधारकांना होत आहे.

रिक्षा भाड्यात वाढ

मागील वर्षभरात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे.

बसस्थानकापासून शहरातील विविध भागांत प्रवाशांना सोडविण्यासाठी पूर्वी असलेल्या दरामध्ये ५ ते १० रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे हे दर निश्चित नाहीत.

त्यामुळे ठरावीक चौकापर्यंतचे दर निश्चित असले तरी चौकातून वसाहतीमध्ये घरापर्यंत सोडण्यासाठी मात्र रिक्षाचालकांच्या मनाचे भाडे आकारले जाते.

वाहतुकीला अडथळा

शहरात वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. सर्वसाधारण वाहनधारकांबरोबरच ऑटोरिक्षा चालकही अनेक वेळा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत.

प्रवासी मिळविण्यासाठी अनेक वेळा चढाओढ होते. वाटेतून एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की सर्रास त्याच ठिकाणावरून ऑटोरिक्षा वळविला जातो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

- अरुण पवार