शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी जिल्ह्यात जप्त केलेल्या वाळू लिलावातून चार कोटींचा महसूल जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 18:55 IST

जिल्ह्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करुन ९ महिन्यांमध्ये महसूल प्रशासनाने ४ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साठ्यांमधूनही प्रशासनाला उत्पन्न प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देएप्रिल २०१७ ते डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने एकूण २४९ वाळू साठ्यांचे लिलाव केलेले आहेत. या लिलावामध्ये २४ हजार ४८५ ब्रास वाळू विक्री केली असून त्यातून प्रशासनाला ४ कोटी २८ लाख ५८ हजार २४७ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

परभणी : जिल्ह्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करुन ९ महिन्यांमध्ये महसूल प्रशासनाने ४ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साठ्यांमधूनही प्रशासनाला उत्पन्न प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना या प्रमुख तीन नद्या असून नदीकाठावरील वाळू घाटांचा लिलाव करुन या ठिकाणची वाळू प्रशासन विक्री करते. यातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र काही घाटांचा वाळू लिलाव झाला नसतानाही त्या ठिकाणाहून वाळूचा उपसा केला जातो. जिल्ह्यात नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करुन या वाळूची वाहतूक जिल्हाबाहेरही केली जात आहे. विशेष म्हणजे काही जणांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्यानंतर या वाळूचे शेत शिवारामध्ये साठेही केले. या साठ्यातून दामदुप्पट दराने वाळू विक्री करुन व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अवैध वाळूच्या वाहतुकीबरोबरच अवैध वाळू साठे जप्त करण्याची मोहीमही हाती घेतली होती. प्रत्येक महिन्यात ही मोहीम राबविण्यात आली. जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलावही करण्यात आले. 

एप्रिल २०१७ ते डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने एकूण २४९ वाळू साठ्यांचे लिलाव केलेले आहेत. या लिलावामध्ये २४ हजार ४८५ ब्रास वाळू विक्री केली असून त्यातून प्रशासनाला ४ कोटी २८ लाख ५८ हजार २४७ रुपयांचा महसूल मिळाला आहे. वाळू साठ्यांच्या लिलावाबरोबरच अवैध वाळू वाहतूक विरुद्धही मागील दहा महिन्यात कारवाई झाली. या कारवाईत आरोपींकडून दंडाची रक्कम प्रशासनाने वसूल केली आहे. त्यामुळे वाळू घाटांच्या लिलावांसह जप्त केलेल्या वाळू साठ्यांच्या लिलावातूनही प्रशासनाच्या महसुलात भर पडली आहे. 

पालम तालुक्यातून मिळाली सर्वाधिक रक्कम

जिल्हा प्रशासनाने सर्वच्या सर्व तालुक्यात वाळूसाठे जप्त करण्याची कारवाई केली होती. त्यात पालम तालुक्यात जप्त वाळू साठ्यांच्या लिलावातून सर्वाधिक १ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे. पूर्णा तालुक्यातून ८८ लाख ५७ हजार रुपये, परभणी तालुक्यात ७१ लाख ६१ हजार, गंगाखेड ५८ लाख ८१ हजार, सोनपेठ २१ लाख २३ हजार, जिंतूर १४ लाख ६८ हजार, मानवत ९ लाख ५४ हजार, पाथरी २ लाख ६९ हजार आणि सेलू तालुक्यात जप्त केलेल्या वाळू साठ्यांच्या लिलावामधून ६६ हजार ११९ रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असल्याची माहिती या विभागातून देण्यात आली.

२४ हजार ब्रास वाळूचा लिलाव९ महिन्यांच्या या काळात जिल्हा प्रशासनाने जप्त केलेल्या वाळू साठ्यातून २४ हजार ४८५ ब्रास वाळू विक्री केली. त्यात पालम तालुक्यात ८ हजार ९३३, परभणी ४ हजार ७५६, पूर्णा ४ हजार ८९४, गंगाखेड २ हजार ३५६, जिंतूर १ हजार ४७१, सोनपेठ १ हजार ४१०, मानवत ४७७, पाथरी १५०, सेलू तालुक्यात ३७ ब्रास वाळूची विक्री झाली.

टॅग्स :parabhaniपरभणी