शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान

By मारोती जुंबडे | Updated: November 27, 2023 11:10 IST

९०.६  मिलिमीटर पाऊस; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; दुधना नदीला आले पाणी

परभणी : रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा पिकाला दिलासा मिळाला असला तरी खरीप हंगामातील कापूस व तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विभागाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाच्या वतीने जिल्ह्यासह मराठवाड्यात तीन दिवस मध्यम व जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तब्बल सव्वा तास हजेरी लावली. जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षात ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तर दुसरीकडे मानवत, परभणी व सेलू तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला पाणी आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी वाहिल्याने खरीप हंगामातील कापूस व तूर पिकांचे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी पिकांना दिलासा मिळाला असून खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी संधी आहे.

 ९०.६  मिलिमीटर पाऊसरविवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई भेडसावणार होती. मात्र ती आता काही अंशी कमी होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवेच्या वतीने घेतलेल्या नोंदीनुसार रविवारी मध्यरात्री ९०.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पावसाळ्यात नाही हो; हिवाळ्यात वाहिले ओढेयंदा जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ७३० मिलिमीटर असताना केवळ ५२३ मिलिमीटर पाऊस झाला. विशेष म्हणजे संपूर्ण पावसाळा खंड स्वरूपाचा पाऊस झाल्याने एकही पाऊस जोरदार झाला नाही  त्यामुळे नदी, नाले, ओढे कोरडेच राहिले. परंतु २६ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले. त्यामुळे पावसाळ्यात नाही पण हिवाळ्यात ओढ्यांना पाणी वाहिल्याने आगामी पाणीटंचाईची समस्या काही अंशी दूर झाली आहे.

रब्बी हंगामातील पेरणी वाढणारजिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने मिळालेल्या अहवालानुसार या विभागाने २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन केले होते. त्यातील आतापर्यंत केवळ १ लाख ४५ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परंतु, ऑक्टोंबर महिन्यात पाऊस जिल्ह्यात बरसला नसल्याने जमिनीत ओलावा नव्हता. त्यामुळे ही पिके ऑक्सिजनवर होती. मात्र रविवारी झालेल्या जोरदार अवकळी पावसामुळे आता रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असून पेरणीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

सोमवारी पहाटेपासून पुन्हा पाऊसरविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले व ओढे खळखळून वाहिले. सोमवारी पहाटेपासूनच पुन्हा पावसाने हजेरी लावली. परभणी, जिंतूर, मानवत व गंगाखेड तालुक्यात सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. 

टॅग्स :parabhaniपरभणी