शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, सोमवारी ३७४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर आठजणांचा कोरोनाने मृत्यू ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, सोमवारी ३७४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर आठजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

कोरोना संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने भीतीच्या सावटाखाली नागरिक वावरत होते. मात्र, मागच्या तीन-चार दिवसांपासून हा संसर्ग कमी झाला असल्याचे जाणवत आहे. १० मे रोजी आरोग्य विभागाला १ हजार ६९३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार २७० अहवालांमध्ये २०६ आणि रॅपिड टेस्टच्या ४२३ अहवालांमध्ये १६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बाधित रुग्णांची संख्या घटली असली, तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. सोमवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ४ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ३४४ झाली असून, ३६ हजार ६३८ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ३५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या ५ हजार ६७१ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १२९, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३१, अक्षदा मंगल कार्यालयात १०४, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार ४५७ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

१२६५ रुग्णांची मात

सोमवारी दिवसभरात १२६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने या रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली. मागील आठवडाभरापासून बाधित रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी ३७४ बाधित रुग्ण नोंद झाले, तर १२६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.