शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

परभणीत हमीभाव केंद्रांकडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:29 IST

सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. ज्या शेतकºयांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर सोयाबीन घेतले, त्यांना चांगले उत्पन्न झाले. मात्र गतवर्षी सारखी याहीवर्षी बाजारपेठेत सोयाबीन उत्पादकांची कोंडी होऊ नये, यासाठी राज्यशासनाने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, परभणी, मानवत, जिंतूर, सेलू या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. या केंद्राच्या माध्यमातून ३ हजार ५० रुपये या हमीभाव दराने सोयाबीनची खरेदी केली जावू लागली. परंतु, नाफेडच्या निकष, अटी व नियमांनी सोयाबीन उत्पादक पुरता घायाळ झाला. हमीभाव केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेत आपले सोयाबीन विक्री करण्यास शेतकºयांनी पसंती दिली. जिल्ह्यातील ६ हमीभाव केंद्रावर दोन महिन्यांत केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.गंगाखेडात खरेदीच नाहीआॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या खरेदी केंद्रावर आतापर्यंत २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. यामध्ये परभणी येथील खरेदी केंद्रावर ५६५ क्विंटल ५० किलो, मानवत ५५३ क्विंटल, जिंतूर ३८५ क्विंटल, सेलू २६२, पूर्णा ४० क्विंटल तर गंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक किलोचीही खरेदी करण्यात आलेली नाही.