शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

परभणीत हमीभाव केंद्रांकडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:29 IST

सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. ज्या शेतकºयांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर सोयाबीन घेतले, त्यांना चांगले उत्पन्न झाले. मात्र गतवर्षी सारखी याहीवर्षी बाजारपेठेत सोयाबीन उत्पादकांची कोंडी होऊ नये, यासाठी राज्यशासनाने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, परभणी, मानवत, जिंतूर, सेलू या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. या केंद्राच्या माध्यमातून ३ हजार ५० रुपये या हमीभाव दराने सोयाबीनची खरेदी केली जावू लागली. परंतु, नाफेडच्या निकष, अटी व नियमांनी सोयाबीन उत्पादक पुरता घायाळ झाला. हमीभाव केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेत आपले सोयाबीन विक्री करण्यास शेतकºयांनी पसंती दिली. जिल्ह्यातील ६ हमीभाव केंद्रावर दोन महिन्यांत केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.गंगाखेडात खरेदीच नाहीआॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या खरेदी केंद्रावर आतापर्यंत २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. यामध्ये परभणी येथील खरेदी केंद्रावर ५६५ क्विंटल ५० किलो, मानवत ५५३ क्विंटल, जिंतूर ३८५ क्विंटल, सेलू २६२, पूर्णा ४० क्विंटल तर गंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक किलोचीही खरेदी करण्यात आलेली नाही.