शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ‘कृषी संजीवनी’ कडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:12 IST

कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकºयांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/देवगावफाटा (परभणी): कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकºयांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.सेलू तालुक्यामध्ये दुधना प्रकल्प आहे. शिवाय दुधना नदीपात्रातूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. यामुळे तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये कृषीपंपधारक शेतकºयांची संख्या जास्त आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन केले जाते. महावितरणच्या वतीने शेतकºयांना वीजपुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून पुरेशी वीज मिळत नाही. शेतकºयांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला कसरत करावी लागत आहे. तालुक्यामध्ये १० हजार ४०० कृषीपंपधारक आहेत. या कृषीपंपधारक शेतकºयांकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतकºयांकडील थकित बिल वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथकांची स्थापना केली होती. तसेच थकित बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरुन थकबाकीमुक्त होण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना सुरु केली. ही योजना शेतकºयांसाठी चांगली असली तरी सेलू तालुक्यात मात्र म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक शेतकºयांकडे ३० ते ४० हजार रुपये थकित बिल असल्याने एकदम एवढे पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत होता. एकूण थकबाकीपैकी पाच टप्प्यापैकी पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. त्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार होता. परंतु, अनेक शेतकºयांनी याकडे पाठ फिरविली आहे.डिसेंबर अखेर सेलू तालुक्यातील १० हजार ४०० थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ १ हजार ४७५ शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून २६ लाखांचा भरणा करण्यात आला. तर अजूनही जवळपास ८ हजार ९२५ शेतकºयांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. दुसरा हप्ता मार्च २०१८, तिसरा हप्ता जून २०१८, चौथा हप्ता सप्टेंबर २०१८ तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यत आहे. त्यामुळे वीज बिल थकबाकीदार शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.शेतकरी सिंचनामध्ये व्यस्त४सेलू तालुक्यामध्ये दुधना नदीपात्रात पाणी सोडले आहे. यापूर्वी डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडले होते. शेतकºयांनी पिकांना पाणी देणे सुरु केले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री-बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. महावितरणने वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन शेतकºयांना सुरळीत वीज पुरवठा करुन द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.मेश्राम यांनी घेतली बैठक४सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत कृषीपंपाच्या थकबाकीचा आढावा सहाय्यक अभियंता आर.आर.मेश्राम यांनी २५ डिसेंबर रोजी घेतला. या बैठकीमध्ये कर्मचारी उपस्थित होते. तसेच देवगावफाटा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत विविध समस्यांची बैठक घेत समस्या सोडविण्याच्या सूचना कर्मचाºयांना त्यांनी दिल्या.खंडीत विजेमुळे शेतकरी त्रस्त४महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली असली तरी कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. सुमारे बारा तासांचे भारनियमन ग्रामीण भागात होत आहे. परिणामी पाणी उपलब्ध असतानाही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरणच्या या धोरणामुळे शेतकºयांत संताप आहे. त्यामुळेच कृषी संजीवनी योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ३ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. काही शेतकºयांनी दोन हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्या शेतकºयांनी १ हजार रुपये रक्कम भरुन योजनेचा लाभ घ्यावा.-आर.आर.मेश्राम, सहाय्यक अभियंता