शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ‘कृषी संजीवनी’ कडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:12 IST

कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकºयांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/देवगावफाटा (परभणी): कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकºयांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.सेलू तालुक्यामध्ये दुधना प्रकल्प आहे. शिवाय दुधना नदीपात्रातूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. यामुळे तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये कृषीपंपधारक शेतकºयांची संख्या जास्त आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन केले जाते. महावितरणच्या वतीने शेतकºयांना वीजपुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून पुरेशी वीज मिळत नाही. शेतकºयांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला कसरत करावी लागत आहे. तालुक्यामध्ये १० हजार ४०० कृषीपंपधारक आहेत. या कृषीपंपधारक शेतकºयांकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतकºयांकडील थकित बिल वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथकांची स्थापना केली होती. तसेच थकित बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरुन थकबाकीमुक्त होण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना सुरु केली. ही योजना शेतकºयांसाठी चांगली असली तरी सेलू तालुक्यात मात्र म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक शेतकºयांकडे ३० ते ४० हजार रुपये थकित बिल असल्याने एकदम एवढे पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत होता. एकूण थकबाकीपैकी पाच टप्प्यापैकी पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. त्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार होता. परंतु, अनेक शेतकºयांनी याकडे पाठ फिरविली आहे.डिसेंबर अखेर सेलू तालुक्यातील १० हजार ४०० थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ १ हजार ४७५ शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून २६ लाखांचा भरणा करण्यात आला. तर अजूनही जवळपास ८ हजार ९२५ शेतकºयांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. दुसरा हप्ता मार्च २०१८, तिसरा हप्ता जून २०१८, चौथा हप्ता सप्टेंबर २०१८ तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यत आहे. त्यामुळे वीज बिल थकबाकीदार शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.शेतकरी सिंचनामध्ये व्यस्त४सेलू तालुक्यामध्ये दुधना नदीपात्रात पाणी सोडले आहे. यापूर्वी डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडले होते. शेतकºयांनी पिकांना पाणी देणे सुरु केले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री-बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. महावितरणने वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन शेतकºयांना सुरळीत वीज पुरवठा करुन द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.मेश्राम यांनी घेतली बैठक४सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत कृषीपंपाच्या थकबाकीचा आढावा सहाय्यक अभियंता आर.आर.मेश्राम यांनी २५ डिसेंबर रोजी घेतला. या बैठकीमध्ये कर्मचारी उपस्थित होते. तसेच देवगावफाटा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत विविध समस्यांची बैठक घेत समस्या सोडविण्याच्या सूचना कर्मचाºयांना त्यांनी दिल्या.खंडीत विजेमुळे शेतकरी त्रस्त४महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली असली तरी कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. सुमारे बारा तासांचे भारनियमन ग्रामीण भागात होत आहे. परिणामी पाणी उपलब्ध असतानाही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरणच्या या धोरणामुळे शेतकºयांत संताप आहे. त्यामुळेच कृषी संजीवनी योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ३ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. काही शेतकºयांनी दोन हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्या शेतकºयांनी १ हजार रुपये रक्कम भरुन योजनेचा लाभ घ्यावा.-आर.आर.मेश्राम, सहाय्यक अभियंता