शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

दुष्काळी उपाययोजनांसाठी सेलूत शेतकऱ्यांचा रस्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:46 IST

दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यात

सेलू (परभणी ) : तालुक्यातील अनेक भागात पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यात या मागणीसाठी चिकलठाणा पाटीवर गुरुवारी (दि.२५ ) सकाळी  11:30 वाजता  शेतकऱ्यांनी रास्तारोको केले. 

मागील वर्षी तालुक्यात अल्पप्रमाणात पाऊस झाला होता. शासनाने तालुका दुष्काग्रस्त म्हणून जाहीर केला. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. मात्र संबंधित इफको टोकियो या कंपनी ने विमा मंजूर असूनही दिला नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. वालुर व चिकलठाणा पंचनामे करुन दुष्काळ जाहीर करावा, प्रति हेक्टर 35 हजार रुपये मदत करावी, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान द्यावे, मजुरांना काम द्यावे, फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको केले. दिड तास रस्ता अडवल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. 

मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलिस निरिक्षक संदिपान शेळके यांनी स्वीकारले. आंदोलनात जि. प. सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, प. स. सभापती पुरुषोत्तम पावडे, रामेश्वर गाडेकर, आनंद डोईफोडे, उद्धव बुधवंत, प्रशांत नाईक, चंद्रकांत गाडेकर ,गुलाब गाडेकर, भानुदास रासवे, अशोक खरात, दिलिप टाके, माऊली घुगे, राजेंद्र गाडेकर, सर्जेराव गाडेकर, अमोल गाडेकर, नारायण जाधव, विकास जाधव, महादेव जाधव, रामप्रसाद टाके, विश्वनाथ रासवे, रामेश्वर रासवे, भारत कदम, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीparabhaniपरभणी