शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

स्वागतासाठी प्लास्टीकचा वापर पाहताच रामदास कदम भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 16:33 IST

प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक येते कुठून? असा प्रश्न उपस्थित केला.

सेलू (परभणी ) :- येथील शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन व शेतकरी संवाद कार्यक्रम शनिवारी (दि. २२ ) दुपारी 1.30  वाजेच्या सुमारास सुरु झाला. यावेळी स्वागतासाठी प्लास्टिक लावलेले पुष्पगुच्छ समोर येताच पर्यावरण मंञी रामदास कदम चांगलेच भडकले. तहसीलदार बालाजी शेवाळे यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढत प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक येते कुठून? असा प्रश्न उपस्थित केला. कदम यांचा वाढलेला पारा पाहून संयोजकांसह उपस्थितीत शांतता पसरली. काही वेळ शेतकऱ्यांशी संवाद साधून कदम परभणीच्या दिशेने रवाना झाले.

शिवसेनेचे जिंतूर विधानसभा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेते राम पाटील खराबे यांच्या नियोजित संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, सुरेश ढगे, राम खराबे पाटील ,रणजित गजमल ,रमेश डख, संदीप लहाने आदींची उपस्थिती होती. कदम व खोतकर यांचे मदत केंद्रात आगमन होताच संयोजकांनी स्वागतासाठी पुष्पगुच्छ समोर आणले. त्या पुष्पगुच्छा भोवती प्लास्टिक गुंडाळलेले दिसताच कदम भडकले. शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. पर्यावरणासाठी आम्ही एवढे काम करत असताना तुम्ही प्लास्टीकाचा वापर करताय! असे म्हणून तहसीलदार बालाजी शेवाळे यांना समोर बोलावून हे प्लास्टिक येते कुठून? तुम्ही काय करताय ? असे प्रश्न विचारत धारेवर धरले. दरम्यान, संयोजकांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या   शेतकऱ्यांना पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास आणले होते. कदम यांचा राग पाहताच  संयोजकांनी प्लास्टिकचे ग्लास तेथून हलवले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमPlastic banप्लॅस्टिक बंदीparabhaniपरभणीenvironmentवातावरण