शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राहुल गांधींच्या आई पंतप्रधान झाल्या; मुख्यमंत्र्यांची जाहीर सभेत 'गलती से मिस्टेक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:37 IST

भर सभेतील 'गलती से मिस्टेक' आता चांगलीच चर्चेची ठरत आहे.

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ पाथरी येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. या सभेत मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला चढवत जोशपूर्ण भाषण केले. मात्र जोशात केलेल्या या भाषणात त्यांनी राहुल गांधी आणि राष्ट्रवादीबाबत चुकीची माहिती दिल्याचे आता समोर आले आहे.  

भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, गरिबी हटावचा मुद्दा मांडत असताना,'राहुल गांधी यांचे पंजोबा पंतप्रधान झाले, आजी पंतप्रधान झाल्या, वडील पंतप्रधान झाले अन् आईही पंतप्रधान झाल्या' असा उल्लेख केला. प्रत्यक्षात सोनिया गांधी या पंतप्रधान झालेल्याच नाहीत. 

दुसरा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा दिला. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने पाकसोबत चर्चा केली पाहिजे, असे नमूद केले असल्याचे सांगताना आरे कशाची चर्चा करता, ते तुम्हाला किड्या-मुंग्यासारखे मारतात आणि तुम्ही तेथे बिर्याणी खाता, लाज वाटत नाही तुम्हाला, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला गेला नव्हता. हे संदर्भ चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांची सभा संपताच समोर आले. यामुळे मुख्यमंत्र्यांची भर सभेतील 'गलती से मिस्टेक' आता चांगलीच चर्चेची ठरत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019parbhani-pcपरभणी