शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात ग्रामस्थांचा राडा; ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By मारोती जुंबडे | Updated: December 18, 2023 18:07 IST

शासकीय कामात अडथळा; शिवीगाळ, मारहाण व खुर्च्यांची केली तोडफोड

परभणी: केंद्र शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम सुरू असताना अज्ञात दहा ते बारा अनोळखी नागरिकांनी गैर कायद्याची मंडळी जमून आपसात वाद करत एकमेकास शिवीगाळ व मारहाण केली. खुर्च्या फेकण्यास सुरुवात करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विविध योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने १७ डिसेंबर रोजी परभणी तालुक्यातील पेडगाव येथे सकाळी ९ वाजता विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे या कार्यक्रमास केंद्राचे उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर झाल्या. परंतु कार्यक्रम सुरू होताच सेल्फी पॉईंटवरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ व धक्काबुकीत झाले. त्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. परिणामी, प्रशासनाला हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी पेडगाव येथील अज्ञात दहा ते अकरा नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दहा ते बारा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून आपसात वाद केला. एकमेकांना शिविगाळ व मारहाण करत शासकीय कर्मचारी व नागरिकांच्या अंगावर खुर्च्यांची फेकाफेक करून दहशत निर्माण केल्याची फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी शंका दुर करणे गरजेचेविकसित भारत संकल्प यात्रा रथ अभियानांतर्गत पेडगाव येथे रविवारी मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचा गोंधळ थांबून त्यांच्या शंकेचे निरासन करणे गरजेचे होते. परंतु तसे न होता हा कार्यक्रम रद्द करून परभणीचा रस्ता धरला. त्यानंतर अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांचा शंकेचे निरासरण करणे गरजेचे असताना ते करू शकले नाही, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार