शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात ग्रामस्थांचा राडा; ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By मारोती जुंबडे | Updated: December 18, 2023 18:07 IST

शासकीय कामात अडथळा; शिवीगाळ, मारहाण व खुर्च्यांची केली तोडफोड

परभणी: केंद्र शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम सुरू असताना अज्ञात दहा ते बारा अनोळखी नागरिकांनी गैर कायद्याची मंडळी जमून आपसात वाद करत एकमेकास शिवीगाळ व मारहाण केली. खुर्च्या फेकण्यास सुरुवात करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विविध योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने १७ डिसेंबर रोजी परभणी तालुक्यातील पेडगाव येथे सकाळी ९ वाजता विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे या कार्यक्रमास केंद्राचे उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर झाल्या. परंतु कार्यक्रम सुरू होताच सेल्फी पॉईंटवरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ व धक्काबुकीत झाले. त्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. परिणामी, प्रशासनाला हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी पेडगाव येथील अज्ञात दहा ते अकरा नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दहा ते बारा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून आपसात वाद केला. एकमेकांना शिविगाळ व मारहाण करत शासकीय कर्मचारी व नागरिकांच्या अंगावर खुर्च्यांची फेकाफेक करून दहशत निर्माण केल्याची फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी शंका दुर करणे गरजेचेविकसित भारत संकल्प यात्रा रथ अभियानांतर्गत पेडगाव येथे रविवारी मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचा गोंधळ थांबून त्यांच्या शंकेचे निरासन करणे गरजेचे होते. परंतु तसे न होता हा कार्यक्रम रद्द करून परभणीचा रस्ता धरला. त्यानंतर अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांचा शंकेचे निरासरण करणे गरजेचे असताना ते करू शकले नाही, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार