शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात ग्रामस्थांचा राडा; ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By मारोती जुंबडे | Updated: December 18, 2023 18:07 IST

शासकीय कामात अडथळा; शिवीगाळ, मारहाण व खुर्च्यांची केली तोडफोड

परभणी: केंद्र शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम सुरू असताना अज्ञात दहा ते बारा अनोळखी नागरिकांनी गैर कायद्याची मंडळी जमून आपसात वाद करत एकमेकास शिवीगाळ व मारहाण केली. खुर्च्या फेकण्यास सुरुवात करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विविध योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने १७ डिसेंबर रोजी परभणी तालुक्यातील पेडगाव येथे सकाळी ९ वाजता विकसित भारत संकल्प यात्रा रथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे या कार्यक्रमास केंद्राचे उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर झाल्या. परंतु कार्यक्रम सुरू होताच सेल्फी पॉईंटवरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ व धक्काबुकीत झाले. त्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. परिणामी, प्रशासनाला हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी पेडगाव येथील अज्ञात दहा ते अकरा नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दहा ते बारा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून आपसात वाद केला. एकमेकांना शिविगाळ व मारहाण करत शासकीय कर्मचारी व नागरिकांच्या अंगावर खुर्च्यांची फेकाफेक करून दहशत निर्माण केल्याची फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी शंका दुर करणे गरजेचेविकसित भारत संकल्प यात्रा रथ अभियानांतर्गत पेडगाव येथे रविवारी मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचा गोंधळ थांबून त्यांच्या शंकेचे निरासन करणे गरजेचे होते. परंतु तसे न होता हा कार्यक्रम रद्द करून परभणीचा रस्ता धरला. त्यानंतर अज्ञात ११ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांचा शंकेचे निरासरण करणे गरजेचे असताना ते करू शकले नाही, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार