शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

जायकवाडीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत रबीच्या पेरण्या लांबणीवर; अवर्तनाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 17:11 IST

पैठण येथील जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात येणा-या पाण्याच्या अवर्तनाचे नियोजन कोमलडले आहे.

ठळक मुद्दे रबी हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांनी मशागती करून ठेवल्या आहेत.जिल्ह्यामध्ये पाणीच दाखल झाले नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पाथरी (जि़ परभणी) : पैठण येथील जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात येणा-या पाण्याच्या अवर्तनाचे नियोजन कोमलडले आहे. रबी हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांनी मशागती करून ठेवल्या आहेत. परंतु, जिल्ह्यामध्ये पाणीच दाखल झाले नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासूून सुरू होतो. मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो. पाथरी उपविभागांतर्गत पाथरी, बोरगाव, गुंज, बाभळगाव ४, बाभळगाव ५, हादगाव, केकरजवळा या सात शाखा आहेत. जायकवाडी धरणातून २०१० साली दोन्ही हंगामासाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सात वर्षानंतर यावर्षी जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. मधल्या काळात प्रवाही सिंचन खंडीत झाले होते. यावर्षी धरण भरल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दोन्ही हंगामासाठी पाणी मिळणार असल्याने शेतक-यांनी पेरणीचे नियोजन केले आहे.

आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू होत असल्याने या काळात जमिनीला पाण्याची आवश्यकता लागते. जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या अवर्तनासंदर्भात औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात २६ आॅक्टोबर रोजी परभणी, जालना आणि औरंगाबाद विभागातील अधिकाºयांची बैठक झाली होती. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात लागणाºया पाण्याचा आढावा घेण्यात आला होता. मात्र पुढील नियोजनासंदर्भात कालवा समितीची बैठकच झाली नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन लांबले आहे. मुंबई येथे १३ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक  झाली असली तरी यासाठीचे जाहीर प्रगटन जायकवाडी विभागाकडून प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे शेतक-यांना अजूनही पाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. गोदावरी नदीपात्रातील पाथरी तालुक्यातील दोन्ही बंधारे तुडूंब भरली आहेत. त्याच बरोबर जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने जवळपास १० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. मात्र सध्या तरी नियोजन होत असल्याने बारमाही पीक तसेच रबी पीक अडचणीत सापडले आहेत. 

वितरिका नादुरुस्तजायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडले आहे. याच बरोबर कालव्यामध्ये काळही साचला असून ठिकठिकाणी वितरिका नादुरुस्त आहेत. यामुळे पाणी सोडल्यास शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचेल किंवा नाही? याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे वितरिका दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही होत आहे.

उसाचे क्षेत्र वाढणारजायकवाडीच्या डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील अर्धा अधिक भाग येतो. जायकवाडीचे पाणी सोडले जाणार असल्याने या भागातील शेतक-यांनी ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. पाथरी तालुक्यातील लिंबा आणि पाथरी येथील दोन्ही खाजगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी पाणी सुटण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीJayakwadi Damजायकवाडी धरण