शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

जायकवाडीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत रबीच्या पेरण्या लांबणीवर; अवर्तनाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 17:11 IST

पैठण येथील जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात येणा-या पाण्याच्या अवर्तनाचे नियोजन कोमलडले आहे.

ठळक मुद्दे रबी हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांनी मशागती करून ठेवल्या आहेत.जिल्ह्यामध्ये पाणीच दाखल झाले नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पाथरी (जि़ परभणी) : पैठण येथील जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात येणा-या पाण्याच्या अवर्तनाचे नियोजन कोमलडले आहे. रबी हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांनी मशागती करून ठेवल्या आहेत. परंतु, जिल्ह्यामध्ये पाणीच दाखल झाले नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासूून सुरू होतो. मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो. पाथरी उपविभागांतर्गत पाथरी, बोरगाव, गुंज, बाभळगाव ४, बाभळगाव ५, हादगाव, केकरजवळा या सात शाखा आहेत. जायकवाडी धरणातून २०१० साली दोन्ही हंगामासाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सात वर्षानंतर यावर्षी जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. मधल्या काळात प्रवाही सिंचन खंडीत झाले होते. यावर्षी धरण भरल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दोन्ही हंगामासाठी पाणी मिळणार असल्याने शेतक-यांनी पेरणीचे नियोजन केले आहे.

आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू होत असल्याने या काळात जमिनीला पाण्याची आवश्यकता लागते. जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या अवर्तनासंदर्भात औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात २६ आॅक्टोबर रोजी परभणी, जालना आणि औरंगाबाद विभागातील अधिकाºयांची बैठक झाली होती. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात लागणाºया पाण्याचा आढावा घेण्यात आला होता. मात्र पुढील नियोजनासंदर्भात कालवा समितीची बैठकच झाली नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन लांबले आहे. मुंबई येथे १३ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक  झाली असली तरी यासाठीचे जाहीर प्रगटन जायकवाडी विभागाकडून प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे शेतक-यांना अजूनही पाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. गोदावरी नदीपात्रातील पाथरी तालुक्यातील दोन्ही बंधारे तुडूंब भरली आहेत. त्याच बरोबर जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने जवळपास १० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. मात्र सध्या तरी नियोजन होत असल्याने बारमाही पीक तसेच रबी पीक अडचणीत सापडले आहेत. 

वितरिका नादुरुस्तजायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडले आहे. याच बरोबर कालव्यामध्ये काळही साचला असून ठिकठिकाणी वितरिका नादुरुस्त आहेत. यामुळे पाणी सोडल्यास शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचेल किंवा नाही? याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे वितरिका दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही होत आहे.

उसाचे क्षेत्र वाढणारजायकवाडीच्या डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील अर्धा अधिक भाग येतो. जायकवाडीचे पाणी सोडले जाणार असल्याने या भागातील शेतक-यांनी ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. पाथरी तालुक्यातील लिंबा आणि पाथरी येथील दोन्ही खाजगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी पाणी सुटण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीJayakwadi Damजायकवाडी धरण