शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

जिल्ह्यातील सात हमीभाव केंद्रांवर २०८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर हमीभाव दराने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी ऑनलाईन ...

परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर हमीभाव दराने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २०८ शेतकऱ्यांकडून २ हजार ८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे.

खरीप हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कापूस उपटून त्याजागी हरभऱ्याचे पीक घेतले. जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८४ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती. सध्या हरभऱ्याची काढणी पूर्ण झाल्यानंतर हा हरभरा शेतकरी विक्रीसाठी खासगी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नेत होता. या संधीचा फायदा घेत खासगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने हरभऱ्याची खरेदी केली. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट को-ऑप.च्यावतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, बोरी, पाथरी, पूर्णा व सोनपेठ या सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दराने हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. यातील १ हजार ११२ शेतकऱ्यांना जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून हरभरा विक्रीला आणण्यासाठी मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २०८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत २ हजार ८४ क्विंटल हरभऱ्याची विक्री या हमीभाव खरेदी केंद्रांकडे केली आहे.

यामध्ये परभणी येथील केंद्रावर ७७ शेतकऱ्यांनी ८८२ क्विंटल ५० किलो, बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर २७ शेतकऱ्यांनी २५७ क्विंटल, पाथरी येथे ८५ शेतकऱ्यांनी ७४९ क्विंटल, पूर्णा येथील हमीभाव केंद्रावर १९ शेतकऱ्यांनी १९५ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची ५ हजार १०० रुपये दराने विक्री केली आहे.

तीन केंद्रांवर खरेदीच नाही

जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले असले तरी या केंद्रांना शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. जिंतूर, सेलू व सोनपेठ या हमीभाव खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी आणण्यासाठी मोबाईलवर एसएमएस पाठवले आहेत. मात्र, १८ मार्चपर्यंत एकाही शेतकऱ्याने आपला हरभरा विक्रीसाठी आणला नाही. खासगी बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढलेले दर यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.