शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१३ लाख क्विंटल कापसाची जिल्ह्यात खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : भारतीय कपास निगम (सीसीआय) आणि महाराष्ट्र कापूस फेडरेनशनने जिल्ह्यात १२ ठिकाणी हमीभाव कापूस खरेदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : भारतीय कपास निगम (सीसीआय) आणि महाराष्ट्र कापूस फेडरेनशनने जिल्ह्यात १२ ठिकाणी हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू केली असून, या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत ५१ हजार ७४ शेतकऱ्यांकडील १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या संकटातून वाचलेल्या कापसाची विक्री करण्यासाठी खुल्या बाजारपेठेत कापसाची आवक करण्यात आली. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कापूस खरेदीला प्रारंभ झाला. भारतीय कपास निगमसह, कापूस फेडरेशनेही तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करुन खरेदीला प्रारंभ केला. मानवत, सेलू, जिंतूर, ताडकळस, पूर्णा, सोनपेठ आणि बोरी येथील बाजार समितीत सीसीआयमार्फत कापूस खरेदी केली जात आहे. त्याचप्रमाणे पाथरी, परभणी, गंगाखेड, पालम, आणि सोनपेठ याठिकाणी फेडरेशनने कापूस खरेदी सुरू केली.

शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यासाठी फेडरेशनने ऑनलाईन नोंदणी करुन घेतली. त्यानुसार ५४ हजार ५७३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या दोन्ही संस्थांनी १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मध्यम लांबीच्या कापसाला ५ हजार ५१५ रुपये तर लांब रेशम कापसाला ५ हजार ८२५ रुपये प्रतिक्विंटल असा भाव दिला जात आहे.

सीसीआयने खरेदी केला ४० हजार शेतकऱ्यांचा कापूस

सीसीआयने जिल्ह्यात सर्वाधिक कापूस खरेदी केला आहे. नोव्हेंबर महिन्यातच सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. आजपर्यंत सीसीआयने ४० हजार १६२ शेतकऱ्यांचा १० लाख ३१ हजार ५९ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. महाराष्ट्र कापूस फेडरेशनने मात्र उशिराने कापूस खरेदीला प्रारंभ केला. फेडरेशनच्या केंद्रावर आतापर्यंत १० हजार ९१२ शेतकऱ्यांचा ३ लाख ४२ हजार ३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

आणखी पंधरा दिवस चालेल खरेदी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३ हजार शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी होणे बाकी आहे. त्यामुळे हा कापूस खरेदी करणे तसेच ऐनवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी आणखी किमान पंधरा दिवस कापूस खरेदी केंद्र सुरू राहतील, अशी अपेक्षा आहे.