शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

'गलिच्छ राजकारणासह शासनाचा निषेध'; जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करून न घेतल्याने परभणीकरांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 16:00 IST

IAS Aanchal Goel : राजकीय दबावापोटी महिला आय.ए.एस. अधिकारी आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी

ठळक मुद्देजिल्हाधिकारी पदी आंचल गोयल रुजू होऊ नयेत, यासाठी राजकारण्यांनी कुटील डाव रचला,त्यांनी पदभार घेतला असता तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते?

परभणी : नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना रुजू करुन न घेताच परत बोलावल्याच्या प्रकरणानंतर सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून, सोमवारी जागरुक नागरिक आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत गलिच्छ राजकारणासह शासनाच्या धोरणाचा कडाडून निषेध नोंदविण्यात आला. ( Anger of Parbhanikar for not approving the Collector Aanchal Goel) 

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आंचल गोयल या आयएएस असलेल्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. विशेष म्हणजे रुजू होण्यासाठी आंचल गोयल पाच दिवसांपूर्वीच परभणीत दाखल झाल्या. मात्र ऐन सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांना रुजू न करुन न घेता, परत बोलावण्यात आले. जिल्हाधिकारी पदाचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे देण्यात आला. या सर्व प्रकरणानंतर परभणीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल रुजू होऊ नयेत, यासाठी राजकारण्यांनी कुटील डाव रचला, त्यांनी पदभार घेतला असता तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? कोणाला त्यांची अडचण होती? एक महिला अधिकारी ८ महिन्यांचे लेकरु घेऊन पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षांचे नेते मंडळी साटेलोटे करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ती महिला पदभार कसा घेणार नाही, यासाठी डावपेच रचतात, ही गोष्ट परभणीकरांनी आंदोलनातून व्यक्त केला संताप.

लांच्छनास्पद आहे, त्याचा निषेध नोंदविण्यात आला.सर्वसामान्य नागरिकांचा हाच संताप सोमवारी जागरुक नागरिक आघाडीच्या निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. आंचल गोयल यांना सन्मानाने पदभार द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. माधुरी क्षीरसागर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, सुभाष जावळे, सुभाष बाकळे, माणिक कदम, संतोष आसेगावकर, राजन क्षीरसागर, गणपत भिसे, नितीन देशमुख, प्रसाद देवके, दिनेश नरवाडकर, संजय शेळके, श्रीकांत हराळे, डॉ.धर्मराज चव्हाण, अच्युत रसाळ, दत्तराव पवार, सुभाष पांचाळ यांच्यासह सर्वसामान्य नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

अस्वस्थ नेत्यांचे प्रयत्न यशस्वी; परभणीच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच नियुक्ती रद्द

आंदोलनातून केलेल्या मागण्याराजकीय दबावापोटी महिला आय.ए.एस. अधिकारी आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जबाबदार असणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, आंचल गोयल यांना सन्मानाने पदभार द्यावा, बेकादेशीर कृत्यासाठी प्रशासनात ढवळाढवळ करणाऱ्यांना दूर करा, भ्रष्ट व जनतेप्रती उत्तरदायित्व नसणाऱ्या प्रशासनातील सर्व स्तरातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी