शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद; निरिक्षण विहिरींच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:57 IST

जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.परभणी येथील भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने सप्टेंबर, आॅक्टोबर, जानेवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याची भूजल पातळी नोंद केली जाते. भूजल पातळी मोजण्यासाठी या विभागाने वेगवेगळ्या भागात ८४ निरिक्षण विहिरी तयार केल्या आहेत. या विहिरींची ठराविक खोली असून प्रत्येक वेळी विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेतली जाते. त्यावरुन भूजल पातळीचा अंदाजही बांधला जातो. दरवर्षी जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाºया नोंदीवर आधारित जिल्ह्यातील पाणी टंचाईचा अंदाज बांधला जातो. मात्र यावर्षी शासनाने आॅक्टोबर महिन्यातच घेतलेल्या नोंदीवरच संभाव्य टंचाईची गावे जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यावरुन जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यात ८४ निरिक्षण विहिरी असून या विहिरींपैकी परभणी तालुक्यातील ४, पूर्णा तालुक्यातील ३, सेलू ४, गंगाखेड ५, पालम २, सोनपेठ ३ आणि जिंतूर तालुक्यातील एका निरिक्षण विहिरीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. एकूण २० विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याने परिसरातील गावांमध्ये आगामी काळात टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.पूर्णा तालुक्यात घटली पातळीगावनिहाय निरिक्षण विहिरींच्या नोंदीत केवळ २० विहिरींची पाणीपातळी घटली असून, पूर्णा तालुक्यात मात्र सरासरी भूजल पातळीत घट झाली आहे. २०१२ ते २०१६ या पाच वर्षात आॅक्टोबर महिन्यामध्ये पूर्णा तालुक्यात ४.५८ मि.मी. भूजल पातळीची खोली असते. मात्र यावर्षी भूजल पातळी ४.७० मि.मी.वर पोहचली आहे. त्यामुळे भूजल पातळीत ०.१२ मीटरची घट झाली आहे. इतर तालुक्यात मात्र सरासरी भूजल पातळी घटली नसली तरी निरिक्षण विहिरींची पातळी मात्र घटली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचे संकट भेडसावण्याची शक्यता आहे.भूजल पातळीत आणखी घट होण्याची शक्यताआॅक्टोबर महिन्यात २० निरिक्षण विहिरींच्या भूजलपातळीत घट झाली आहे. आता पावसाळा उरकला असून पाण्याचे स्त्रोत आटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे दिवसेंदिवस जिल्ह्याच्या भूजलपातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने ४१० संभाव्य गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर केली आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या उपाययोजनांसाठी निधी मागविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी जि.प.कडून टंचाई कृती आराखडे मागविले आहेत. मात्र अद्याप हे आराखडे दाखल झाले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.या गावात घटली भूजल पातळीपरभणी तालुक्यात मुरुंबा येथील भूजल पातळी ०.७६ मीटरने घटली आहे. असोला येथील भूजल पातळी ६.७३ मीटरने घटली आहे. नांदगाव बु. येथील भूजल पातळीत ८.९० मीटरची घट झाली आहे. तसेच बोरवंड बु. येथे २.१० मीटरची घट नोंदविण्यात आली. पूर्णा तालुक्यात बलसा ०.१४, एकरुखा ७.६४, चुडावा ०.६६ मीटर भूजल पातळीत घट झाली आहे. सेलू तालुक्यात पिंपरी खु.०.९४, म्हाळसापूर ३.६६, रवळगाव ३.२०, चिकलठाणा १.६०, गंगाखेड तालुक्यात खळी ६.१२, गंगाखेड ०.४४, महातपुरी ०.०२, धनगरमोहा ०.७०, डोंगरगाव पिंपळा ०.३२, पालम तालुक्यात खरब धानोरा ०.४४, फरकंडा २.९४, सोनपेठ तालुक्यात शिर्शी बु. ०.४६, निळा ०.७२, खडका २.६२ तर जिंतूर तालुक्यात नागापूर येथील निरिक्षण विहिरीच्या भूजल पातळीत ०.३६ मीटरची घट झाली आहे.