शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद; निरिक्षण विहिरींच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:57 IST

जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.परभणी येथील भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने सप्टेंबर, आॅक्टोबर, जानेवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याची भूजल पातळी नोंद केली जाते. भूजल पातळी मोजण्यासाठी या विभागाने वेगवेगळ्या भागात ८४ निरिक्षण विहिरी तयार केल्या आहेत. या विहिरींची ठराविक खोली असून प्रत्येक वेळी विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेतली जाते. त्यावरुन भूजल पातळीचा अंदाजही बांधला जातो. दरवर्षी जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाºया नोंदीवर आधारित जिल्ह्यातील पाणी टंचाईचा अंदाज बांधला जातो. मात्र यावर्षी शासनाने आॅक्टोबर महिन्यातच घेतलेल्या नोंदीवरच संभाव्य टंचाईची गावे जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यावरुन जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यात ८४ निरिक्षण विहिरी असून या विहिरींपैकी परभणी तालुक्यातील ४, पूर्णा तालुक्यातील ३, सेलू ४, गंगाखेड ५, पालम २, सोनपेठ ३ आणि जिंतूर तालुक्यातील एका निरिक्षण विहिरीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. एकूण २० विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याने परिसरातील गावांमध्ये आगामी काळात टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.पूर्णा तालुक्यात घटली पातळीगावनिहाय निरिक्षण विहिरींच्या नोंदीत केवळ २० विहिरींची पाणीपातळी घटली असून, पूर्णा तालुक्यात मात्र सरासरी भूजल पातळीत घट झाली आहे. २०१२ ते २०१६ या पाच वर्षात आॅक्टोबर महिन्यामध्ये पूर्णा तालुक्यात ४.५८ मि.मी. भूजल पातळीची खोली असते. मात्र यावर्षी भूजल पातळी ४.७० मि.मी.वर पोहचली आहे. त्यामुळे भूजल पातळीत ०.१२ मीटरची घट झाली आहे. इतर तालुक्यात मात्र सरासरी भूजल पातळी घटली नसली तरी निरिक्षण विहिरींची पातळी मात्र घटली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचे संकट भेडसावण्याची शक्यता आहे.भूजल पातळीत आणखी घट होण्याची शक्यताआॅक्टोबर महिन्यात २० निरिक्षण विहिरींच्या भूजलपातळीत घट झाली आहे. आता पावसाळा उरकला असून पाण्याचे स्त्रोत आटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे दिवसेंदिवस जिल्ह्याच्या भूजलपातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने ४१० संभाव्य गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर केली आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या उपाययोजनांसाठी निधी मागविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी जि.प.कडून टंचाई कृती आराखडे मागविले आहेत. मात्र अद्याप हे आराखडे दाखल झाले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.या गावात घटली भूजल पातळीपरभणी तालुक्यात मुरुंबा येथील भूजल पातळी ०.७६ मीटरने घटली आहे. असोला येथील भूजल पातळी ६.७३ मीटरने घटली आहे. नांदगाव बु. येथील भूजल पातळीत ८.९० मीटरची घट झाली आहे. तसेच बोरवंड बु. येथे २.१० मीटरची घट नोंदविण्यात आली. पूर्णा तालुक्यात बलसा ०.१४, एकरुखा ७.६४, चुडावा ०.६६ मीटर भूजल पातळीत घट झाली आहे. सेलू तालुक्यात पिंपरी खु.०.९४, म्हाळसापूर ३.६६, रवळगाव ३.२०, चिकलठाणा १.६०, गंगाखेड तालुक्यात खळी ६.१२, गंगाखेड ०.४४, महातपुरी ०.०२, धनगरमोहा ०.७०, डोंगरगाव पिंपळा ०.३२, पालम तालुक्यात खरब धानोरा ०.४४, फरकंडा २.९४, सोनपेठ तालुक्यात शिर्शी बु. ०.४६, निळा ०.७२, खडका २.६२ तर जिंतूर तालुक्यात नागापूर येथील निरिक्षण विहिरीच्या भूजल पातळीत ०.३६ मीटरची घट झाली आहे.