शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चारही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

रब्बी हंगामात उत्पन्न वाढण्याची शक्यता परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना ...

रब्बी हंगामात उत्पन्न

वाढण्याची शक्यता

परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होत आहे. त्यामुळे या हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. शिवाय यंदा प्रथमच उसाचे क्षेत्र वाढल्याने ऊस उत्पादनातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून या हंगामात आतापर्यंत दोन पाणी आवर्तने मिळाली आहेत. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

शासकीय कार्यालयांत स्वच्छतेची कामे

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत परिसरातील विविध शासकीय कार्यालये तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, त्याची जय्यत तयारी शहरात सुरू झाली आहे.

जायकवाडीच्या कालव्यात साचला गाळ

परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात जागोजागी गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी दोन वेळा पाणी आवर्तन सोडण्यात आले. प्रकल्पाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील सिमेंट रस्त्याला गेले तडे

परभणी : येथील पारदेश्वर मंदिर ते जुना पॉवर हाऊस या सिमेंट रस्त्याला तडे गेले असून, या रस्त्यावर किरकोळ अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या मधोमध तडे पडल्याने वाहने घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

पीक कर्जाच्या वाटपाला मिळेना गती

परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप संथगतीने होत आहे. संपूर्ण रब्बी हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रब्बी हंगामात प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही बँकांनी कर्ज वाटपासाठी हात आखडता घेतला आहे.

बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांना कोणत्याच सुविधा उपलब्ध होत नाहीत. पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था या सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. त्याचप्रमाणे येथील सीसी टीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.