शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

तीन जिल्ह्यातील प्रदूषणाचा होणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST

परभणी : महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या वतीने आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या माध्यमातून आगामी दोन वर्षांत परभणी, हिंगोली आणि ...

परभणी : महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या वतीने आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या माध्यमातून आगामी दोन वर्षांत परभणी, हिंगोली आणि बीड या तीन जिल्ह्यातील हवेतील प्रदूषणाचा अभ्यास केला जाणार आहे. २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

या उद्घाटन कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, तहसीलदार संजय बिराजदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी जयंत कदम, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, प्रबंधक विजय मोरे, प्रकल्प समन्वयक डॉ. बापूसाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत परभणी, वसमत आणि परळी शहरातील हवेमध्ये प्रदूषणाची पातळी यंत्राच्या माध्यमातून तपासत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासाच्या मानांकनाच्या मर्यादित आहे की नाही याचा अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुदानातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे शहरातील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजनडाय ऑक्साईड व धूलिकण या हवा प्रदूषण घटकाचे मोजमाप केले जाणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार या प्रदूषकाची मात्रा ८० मायक्रो ग्रॅम प्रतिमीटर घन व धूलिकणाचे पीएम २.५ मानांकन ६० व पीएम-१० चे मानांकन १०० मायक्रो ग्रॅम प्रतिमीटर घन अपेक्षित आहे. पीएम २.५ धुलीकण हे श्वसननलिकेतून फुफ्फुसात प्रवेश केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. यासंदर्भाने अभ्यास करून मार्च २०२३ मध्ये राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.

हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ.व्ही.एम. मोटघरे, उपप्रादेशिक अधिकारी स्नेहा कांबळे व उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, चंद्रकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भोसले, प्रा.आर.डी. मस्के, प्रा. गिरीश देशमुख, श्रीनिवास काळे व मुंजा मुंडे आदी हा प्रकल्प राबवित आहेत.