शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. ...

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अनलॉक प्रक्रियेनंतर निवडणूक विभागाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होईल, याकडे ग्रामीण भागातील नेते मंडळींचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तहसीलदार १५ डिसेंबर रोजी या निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र घेता व सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी ३ नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असून, त्यांना चिन्हांचे वाटपही केले जाणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मत मोजणी होणार असून, २१ जानेवारी रोजी या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आचारसंहितेचा कामांवर परिणाम

मार्चमध्ये लॉकडाऊननंतर शासनाने सर्व योजनांचा निधी गाेठविला होता. फक्त कोरोना उपाययोजनांसाठी निधीची उपलब्धता करण्यात आली. जूनमध्ये अनलॉक जाहीर केल्यानंतर राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला होता. त्यामुळे विकास योजनांसाठी शासनाकडे निधी नव्हता. गेल्या दोन महिन्यांत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना महिनाभरापूर्वी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नवीन विकास कामांना मंजुरी देणे, उद्घाटन करणे आदी प्रक्रिया ठप्प झाली. गेल्या आठवड्यातच पदवीधरची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर सदरील आचारसंहिता संपुष्टात आली होती. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आणखी महिनाभर विकास कामे ठप्प होणार आहेत.