शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. ...

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अनलॉक प्रक्रियेनंतर निवडणूक विभागाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होईल, याकडे ग्रामीण भागातील नेते मंडळींचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तहसीलदार १५ डिसेंबर रोजी या निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र घेता व सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी ३ नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असून, त्यांना चिन्हांचे वाटपही केले जाणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मत मोजणी होणार असून, २१ जानेवारी रोजी या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आचारसंहितेचा कामांवर परिणाम

मार्चमध्ये लॉकडाऊननंतर शासनाने सर्व योजनांचा निधी गाेठविला होता. फक्त कोरोना उपाययोजनांसाठी निधीची उपलब्धता करण्यात आली. जूनमध्ये अनलॉक जाहीर केल्यानंतर राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला होता. त्यामुळे विकास योजनांसाठी शासनाकडे निधी नव्हता. गेल्या दोन महिन्यांत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना महिनाभरापूर्वी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नवीन विकास कामांना मंजुरी देणे, उद्घाटन करणे आदी प्रक्रिया ठप्प झाली. गेल्या आठवड्यातच पदवीधरची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर सदरील आचारसंहिता संपुष्टात आली होती. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आणखी महिनाभर विकास कामे ठप्प होणार आहेत.