शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामपंचायतीतूनच घडले राजकीय नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे २००५ ते २००७ या कालावधीत सोनपेठ तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर ...

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे २००५ ते २००७ या कालावधीत सोनपेठ तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. त्यात त्यांना तब्बल ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली होती. माजी आ. माणिकराव आंबेगावकर हे मानवत तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे १९८२ ते १९९२ सरपंच होते. त्यानंतर त्यांनी सिंगणापूर विधानसभा मतदार संघातून १९९९ मध्ये विजय मिळविला होता. सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथील ग्रा.पं. सदस्य राजेंद्र लहाने हे २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक काकडे हे कवधड ग्रामपंचायतीचे सदस्य होते. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे हे रेणापूर ग्रामपंचायतीचे सरपंच होते.

जिंतूर तालुक्यातही अनेकांनी मिळविली पदे

जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी इंदुमती घुगे या विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जि.प.निवडणुकीत विजय मिळविला. त्यानंतर जि.प.च्या बाल व बाकल्याण सभापती पदावर त्यांची निवड झाली होती. तसेच चारठाणा येथील मीनाताई राऊत याही ग्रा.पं. निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यानंतर जि.प. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी बांधकाम सभापती पद मिळिवले.

असे घडले नेतृत्व !

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा दिवंगत विलासराव देशमुख यांचा आदर्श आजही अनेक ग्रा.पं. सदस्यांसमोर आहे. त्यानुसारच अनेकांची वाटचाल सुरू आहे.

ग्रामपंचायत पातळीवर निवडणूक लढविल्यानंतर अनेकांनी पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवून राजकीय वाटचालीला सुरुवात केली. त्यामध्ये बहुतांश नेते मंडळींना यश आले.

ग्रामपंचायत पातळीवर काम केल्यानंतर गावाच्या समस्या सोडवित असताना आलेले अनुभव पुढे राजकीय जीवनात वाटचाल करताना कामी येतात. त्यातूनच अनेकांनी यशस्वी वाटचाल केल्याचे दिसून येते.