शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीतूनच घडले राजकीय नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे २००५ ते २००७ या कालावधीत सोनपेठ तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर ...

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे २००५ ते २००७ या कालावधीत सोनपेठ तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. त्यात त्यांना तब्बल ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली होती. माजी आ. माणिकराव आंबेगावकर हे मानवत तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे १९८२ ते १९९२ सरपंच होते. त्यानंतर त्यांनी सिंगणापूर विधानसभा मतदार संघातून १९९९ मध्ये विजय मिळविला होता. सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथील ग्रा.पं. सदस्य राजेंद्र लहाने हे २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक काकडे हे कवधड ग्रामपंचायतीचे सदस्य होते. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे हे रेणापूर ग्रामपंचायतीचे सरपंच होते.

जिंतूर तालुक्यातही अनेकांनी मिळविली पदे

जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी इंदुमती घुगे या विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जि.प.निवडणुकीत विजय मिळविला. त्यानंतर जि.प.च्या बाल व बाकल्याण सभापती पदावर त्यांची निवड झाली होती. तसेच चारठाणा येथील मीनाताई राऊत याही ग्रा.पं. निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यानंतर जि.प. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी बांधकाम सभापती पद मिळिवले.

असे घडले नेतृत्व !

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा दिवंगत विलासराव देशमुख यांचा आदर्श आजही अनेक ग्रा.पं. सदस्यांसमोर आहे. त्यानुसारच अनेकांची वाटचाल सुरू आहे.

ग्रामपंचायत पातळीवर निवडणूक लढविल्यानंतर अनेकांनी पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवून राजकीय वाटचालीला सुरुवात केली. त्यामध्ये बहुतांश नेते मंडळींना यश आले.

ग्रामपंचायत पातळीवर काम केल्यानंतर गावाच्या समस्या सोडवित असताना आलेले अनुभव पुढे राजकीय जीवनात वाटचाल करताना कामी येतात. त्यातूनच अनेकांनी यशस्वी वाटचाल केल्याचे दिसून येते.