शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ग्रामपंचायतीतूनच घडले राजकीय नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे २००५ ते २००७ या कालावधीत सोनपेठ तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर ...

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे २००५ ते २००७ या कालावधीत सोनपेठ तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. त्यात त्यांना तब्बल ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली होती. माजी आ. माणिकराव आंबेगावकर हे मानवत तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे १९८२ ते १९९२ सरपंच होते. त्यानंतर त्यांनी सिंगणापूर विधानसभा मतदार संघातून १९९९ मध्ये विजय मिळविला होता. सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथील ग्रा.पं. सदस्य राजेंद्र लहाने हे २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक काकडे हे कवधड ग्रामपंचायतीचे सदस्य होते. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे हे रेणापूर ग्रामपंचायतीचे सरपंच होते.

जिंतूर तालुक्यातही अनेकांनी मिळविली पदे

जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी इंदुमती घुगे या विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जि.प.निवडणुकीत विजय मिळविला. त्यानंतर जि.प.च्या बाल व बाकल्याण सभापती पदावर त्यांची निवड झाली होती. तसेच चारठाणा येथील मीनाताई राऊत याही ग्रा.पं. निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यानंतर जि.प. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी बांधकाम सभापती पद मिळिवले.

असे घडले नेतृत्व !

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा दिवंगत विलासराव देशमुख यांचा आदर्श आजही अनेक ग्रा.पं. सदस्यांसमोर आहे. त्यानुसारच अनेकांची वाटचाल सुरू आहे.

ग्रामपंचायत पातळीवर निवडणूक लढविल्यानंतर अनेकांनी पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवून राजकीय वाटचालीला सुरुवात केली. त्यामध्ये बहुतांश नेते मंडळींना यश आले.

ग्रामपंचायत पातळीवर काम केल्यानंतर गावाच्या समस्या सोडवित असताना आलेले अनुभव पुढे राजकीय जीवनात वाटचाल करताना कामी येतात. त्यातूनच अनेकांनी यशस्वी वाटचाल केल्याचे दिसून येते.