शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

परभणीचे वक्फ अधिकारी कार्यालय बंद; वक्फ मंडळ औरंगाबाद येथून कामकाज पाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 19:02 IST

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे ११०० पेक्षा अधिक मालमत्ता आहेत.

परभणी : जिल्ह्यातील वक्फ मिळकतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे कार्यरत असलेले जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय बंद करण्यात आले असून या कार्यालयाचा कारभार आता औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयातून चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वक्फ मिळकतीसंदर्भातील समस्या आणि तक्रारींसाठी आता नागरिकांना थेट औरंगाबाद गाठावे लागणार  आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी येथे जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय मागील अनेक वर्षांपासून कार्यरत होते. शहरातील जिल्हा न्यायालय परिसरातील एका इमारतीत या कार्यालयाचा कारभार चालत होता. परभणी जिल्ह्यातील वक्फ मिळकतींच्या नोंदी ठेवणे, या मिळकतींवर नियंत्रण ठेवणे यासह इतर अनेक कामे या कार्यालयातून केली जातात. जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील वक्फ संस्थांचे वक्फ फंड जमा करुन घेणे, वक्फ मंडळाच्या अखत्यारितील मशिदींमधील पेश इमाम व मौजान यांचे पगार करणे, मशिदी आणि दर्गाची देखभाल करणे, त्यांची वीज बिले भरणे, विविध दर्गा, देवस्थानामध्ये संदल काढणे, ऊरुस भरविणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, विवाह विषयक नोंदीचे अद्ययावत दस्ताऐवज ठेवणे, जिल्ह्यातील वक्फ मिळकती संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आदी कामे या कार्यालयाच्या माध्यमातून केली जात होती.

जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील वक्फ मिळकतींवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.  मात्र फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची बैठक होऊन त्यात हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परभणी येथील  वक्फ कार्यालयातील सर्व दस्ताऐवज औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात हलविण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे कर्मचारीही आता औरंगाबाद  कार्यालयातूनच  कामकाज पाहणार आहेत.

१ हजारापेक्षा अधिक मालमत्तामहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे ११०० पेक्षा अधिक मालमत्ता आहेत. त्याच प्रमाणे वक्फ मंडळाची जिल्ह्यामध्ये साधारणत: ५ हजार एकर जमीन आहे. या मालमत्ता आणि जमिनीचे अद्ययावत दस्ताऐवज जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे असतात. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असलेल्या या मालमत्तांवर अतिक्रमणे होत आहेत. अनेक मालमत्ता विषयी न्यायालयात वाद आहेत. काही मालमत्तांची विक्रीही झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत या मालमत्तांवर नियंत्रण ठेवणे जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना शक्य होते. मात्र हे कार्यालयच औरंगाबाद येथे हलविल्याने मालमत्तांवरील नियंत्रण सैल होऊन अतिक्रमणे वाढण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयीन प्रकरणातही दिरंगाई होऊ शकते.

निर्णय रद्द करण्याची मागणीपरभणी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांचे कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. हे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवस्थित सुरु होते. या मंडळातील काही सदस्यांनी वक्फ मिळकती हस्तांतरण केल्याचा आरोप होत आहे. त्यातूनच ही अभिलेखे सर्वसामान्य नागरिकांना मिळू नयेत. नागरिकांनी त्याचा पाठपुरावा करु नये, या उद्देशानेच गैरकायदेशीर बैठक घेऊन कार्यालय स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.इम्तियाज खान यांनी केला आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारparabhaniपरभणीAurangabadऔरंगाबाद