शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचे वक्फ अधिकारी कार्यालय बंद; वक्फ मंडळ औरंगाबाद येथून कामकाज पाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 19:02 IST

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे ११०० पेक्षा अधिक मालमत्ता आहेत.

परभणी : जिल्ह्यातील वक्फ मिळकतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे कार्यरत असलेले जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय बंद करण्यात आले असून या कार्यालयाचा कारभार आता औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयातून चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वक्फ मिळकतीसंदर्भातील समस्या आणि तक्रारींसाठी आता नागरिकांना थेट औरंगाबाद गाठावे लागणार  आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी येथे जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय मागील अनेक वर्षांपासून कार्यरत होते. शहरातील जिल्हा न्यायालय परिसरातील एका इमारतीत या कार्यालयाचा कारभार चालत होता. परभणी जिल्ह्यातील वक्फ मिळकतींच्या नोंदी ठेवणे, या मिळकतींवर नियंत्रण ठेवणे यासह इतर अनेक कामे या कार्यालयातून केली जातात. जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील वक्फ संस्थांचे वक्फ फंड जमा करुन घेणे, वक्फ मंडळाच्या अखत्यारितील मशिदींमधील पेश इमाम व मौजान यांचे पगार करणे, मशिदी आणि दर्गाची देखभाल करणे, त्यांची वीज बिले भरणे, विविध दर्गा, देवस्थानामध्ये संदल काढणे, ऊरुस भरविणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, विवाह विषयक नोंदीचे अद्ययावत दस्ताऐवज ठेवणे, जिल्ह्यातील वक्फ मिळकती संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आदी कामे या कार्यालयाच्या माध्यमातून केली जात होती.

जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील वक्फ मिळकतींवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.  मात्र फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची बैठक होऊन त्यात हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परभणी येथील  वक्फ कार्यालयातील सर्व दस्ताऐवज औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात हलविण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे कर्मचारीही आता औरंगाबाद  कार्यालयातूनच  कामकाज पाहणार आहेत.

१ हजारापेक्षा अधिक मालमत्तामहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे ११०० पेक्षा अधिक मालमत्ता आहेत. त्याच प्रमाणे वक्फ मंडळाची जिल्ह्यामध्ये साधारणत: ५ हजार एकर जमीन आहे. या मालमत्ता आणि जमिनीचे अद्ययावत दस्ताऐवज जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे असतात. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असलेल्या या मालमत्तांवर अतिक्रमणे होत आहेत. अनेक मालमत्ता विषयी न्यायालयात वाद आहेत. काही मालमत्तांची विक्रीही झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत या मालमत्तांवर नियंत्रण ठेवणे जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना शक्य होते. मात्र हे कार्यालयच औरंगाबाद येथे हलविल्याने मालमत्तांवरील नियंत्रण सैल होऊन अतिक्रमणे वाढण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयीन प्रकरणातही दिरंगाई होऊ शकते.

निर्णय रद्द करण्याची मागणीपरभणी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांचे कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. हे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवस्थित सुरु होते. या मंडळातील काही सदस्यांनी वक्फ मिळकती हस्तांतरण केल्याचा आरोप होत आहे. त्यातूनच ही अभिलेखे सर्वसामान्य नागरिकांना मिळू नयेत. नागरिकांनी त्याचा पाठपुरावा करु नये, या उद्देशानेच गैरकायदेशीर बैठक घेऊन कार्यालय स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.इम्तियाज खान यांनी केला आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारparabhaniपरभणीAurangabadऔरंगाबाद