शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

परभणीचे सुपुत्र जवान रघुनाथ चिमले यांना त्रिपुरा येथे विरगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:16 IST

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील सिरपूर येथे होणार अंत्यसंस्कार

पालम : तालुक्यातील सिरपूर येथील भूमिपुत्र रघुनाथ मोतीराम चिमले (वय ४०) यांना त्रिपुरा येथे भारतीय सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना रविवारी ( दि. १ ) वीरगती प्राप्त झाली. आजारामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. यामुळे चिमले कुटुंबीयांसह सिरपूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रघुनाथ चिमले २००३ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले. जम्मू व कश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यात त्यांनी २० वर्षे सेवा बजावली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्यांना आजाराने गाठले. आठ दिवसांपूर्वी त्रिपुरात कर्तव्यावर असताना प्रकृती बिघडल्याने त्यांना आगरताळा येथील सैनिकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१० मिनिटांनी रघुनाथ यांची प्राणज्योत मालवली. रघुनाथ यांनी भारतमातेची दीर्घकाळ सेवा केली.  मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे ते स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या विचारात होते. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. 

मंगळवारी गावी होणार अंत्यसंस्कारआज दुपारी उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव सीमा सुरक्षा बलाच्या ताब्यात दिले जाईल. त्यानंतर कोलकत्याहून विमानाद्वारे मुंबई किंवा औरंगाबाद येथे मंगळवारी रघुनाथ चिमले यांचा पार्थिव मूळ गाव सिरपूर येथे आणण्यात येईल अशी माहिती चांदुजी चिमले यांनी दिली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानparabhaniपरभणी