शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणीचा पारा ४३.२ अंशांवर : तापमानाबरोबरच जिल्ह्यात उकाडाही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:50 IST

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.यावर्षी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मार्च महिन्यापासूनच परभणी जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकला असून तब्बल दोन महिने नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. मे महिन्यात देखील उन्हाचा पारा वाढलेलाच असून जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण मे महिना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, त्यात भर पडली ती उकाड्याची. मागील आठवड्यापासून वाढत्या तापमानाबरोबरच वातावरणात उकाडाही वाढला आहे. दिवस आणि रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता कमी होते आणि उकाड्यात वाढ होत असते. यावर्षी मात्र ऊन तसू भरही कमी झाले नाही. शनिवारी जिल्ह्यात ४३.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली असून किमान तापमानही २७.५ अंशापर्यंत पोहचले होते. सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने शनिवारी नागरिकांना प्रचंड उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. त्यातच उकाड्यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही झाली होती. सायंकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात कमालीची उष्णता होती. त्यामुळे सूर्य मावळल्यानंतरही नागरिकांची घालमेल सुरुच होती.पुढील आठवडाही वाढत्या तापमानाचावसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने २६ ते ३० मेपर्यंतचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. यात ३० मेपर्यंत परभणी जिल्ह्याचे तापमान ४४ ते ४५ अंशापर्यंत राहील, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता नसून नागरिकांना कडक ऊन आणि उकाडा सहन करावा लागणार आहे. सध्या काही भागात तापमान वाढत असले तरी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान