शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीकरांचा भंगार बसेसमधून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 16:05 IST

परभणी आगारातील निम्म्यापेक्षा अधिक बसेसची बिकट अवस्था झाली आहे.

- मारोती जुंबडे

परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातील निम्म्यापेक्षा अधिक बसेसची बिकट अवस्था झाली आहे. या बसेस भंगारमध्ये टाकण्याच्या लायकीच्या असतानाही रस्त्यांवरुन धावत असल्याने प्रवाशांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.  

‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रिद घेवून प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय परभणी शहरात आहे़ या कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील ४ व हिंगोली जिल्ह्यातील ३ अशा एकूण ७ आगारांचा कारभार चालतो़ परभणी आगारातून दररोज ६६ बसेस धावतात़ दिवसगणिक ३७२ फेऱ्यांमधून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. त्यातून कधी तोटा तर कधी नफा परभणी आगाराला मिळतो़ यासाठी १३३ बसचालक व १५४ वाहकही कार्यरत आहेत़ परभणी आगारात असणाऱ्या बहुतांश बसेस मोडकळीस आलेल्या आहेत़ त्यांचे इंजिनही बीएस-२, बीएस-३ व बीएस-४ या प्रकारचे आहेत़ मागील काही दिवसांपासून परभणी आगाराच्या कारभाराबद्दल प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

सध्या तर ग्रामीण भागात या आगारातून धावणाऱ्या बहुतांश बसेसच्या काचा फुटलेल्या आहेत़ आसन व्यवस्थेवर धूळ चढलेली आहे़ बसच्या समोरील इंजिनचा भाग उघडा पडला आहे़ तर काही बसेसचा पाठीमागील भागच गायब असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़ त्यामुळे पैसे भरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून मात्र सुविधा देण्यासाठी आखडता हात घेतला जात असल्याचे दिसून येते़ बसच्या दुरवस्थेमुळे अनेक प्रवाशांना गैरसोयींचा सामनाही करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दररोज दोन-तीन बसेस दुरुस्तीसाठी आगारातील वर्कशॉपमध्ये कामासाठी असतात़ 

अनेक वेळा दुरुस्ती न करताच बसेस प्रत्यक्ष मार्गावरुन चालविल्या जातात. त्यामुळे प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात गेलेली बस रस्त्यामध्येच नादुरुस्त झाली तर दिवसभर चालक-वाहकाला एकाच ठिकाणी बसून राहावे लागते़ याचा फटका प्रवाशांना बसतो. परभणी आगाराच्या प्रशासनाने लक्ष देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी चांगल्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे़ 

एक वर्ष तरी भंगार बसमधूनच करावा लागणार प्रवासएसटी महामंडळाच्या परभणी आगारात ६६ बसेस असून या सर्व बसेस बीएस-२ ते बीएस-४ इंजिनच्या आहेत़ त्यामुळे यातून प्रदूषणात वाढ होत असल्याचे वरिष्ठ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले़ त्यामुळे या इंजिनच्या बस बंद करून आता बीएस-६ इंजिनच्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी चर्चा वरिष्ठ स्तरावर झालेल्या एका बैठकीत करण्यात आली आहे़ त्यामुळे जोपर्यंत बीएस-६ इंजिनच्या बसेस उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत प्रवाशांतून या भंगार बसेसमधून प्रवास करावा लागणार आहे. आगार प्रशासनाही नवीन बस कधी दाखल होतात, याची प्रतीक्षा करीत आहे.

प्रथमोपचार पेटी व अग्नीशमन गायबएसटी महामंडळाच्या परभणी आगारातून ६६ बसेस धावतात़ एका बसमधून कधी ४५-५० प्रवासी प्रवास करतात़ प्रवास करीत असताना एखादी अनुचित घटना घडली आणि त्यामध्ये एखादा प्रवासी जखमी झाला तर तत्काळ बसमध्येच प्रथमोपचार मिळावा, यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने हजारो रुपयांचा खर्च करीत प्रथमोपचार पेटी सर्व बसेसमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत़ सोमवारी केलेल्या पाहणीमध्ये ठराविक एक-दोन बसेसमध्येच प्रथमोपचार पेटी आढळून आली़ त्याचबरोबर अग्नीशमन यंत्रणाही गायब असल्याचे दिसून आले़ त्यामुळे केवळ प्रवाशांकडून पैसे वसूल करायचे; परंतु, सोयी-सुविधा व सुरक्षिततेकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करायचे. याबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

बसेसच्या स्वच्छतेकडेही आगार प्रशासनाचे दुर्लक्षदिवसभर प्रवाशांची ने-आण करून बस आगारात आल्यानंतर पाण्याने ती स्वच्छ करण्याची जबाबदारी एका खाजगी एजन्सीला एसटी महामंडळाकडून देण्यात आली़ या खाजगी एजन्सीतील कर्मचारी केवळ बसेसवर पाणी मारून मोकळे होतात; परंतु, आतमध्ये आसन व्यवस्थेवर साचलेली धूळ, प्रवाशांनी केलेली घाण साफ करण्याकडे मात्र ही एजन्सी दुर्लक्ष करीत असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़ त्यामुळे बाहेरून दिखावा आतून बंडाळी होत असल्याचे पहावयास मिळाले़ 

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटीBus Driverबसचालकtourismपर्यटन