शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

परभणीत ‘समृद्ध महाराष्ट्र’ योजनेला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:18 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़२०१६ पूर्वी जिल्ह्यात सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती़ केंद्र शासनाच्या वतीने २००८ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी विहीर, शेततळे व सिंचनाच्या सुविधांचे कामे या योजनेंतर्गत करण्यात येत होते़ परंतु, अनेक ठिकाणची कामे ठप्प पडली होती़ सिंचनाची कामे झाली नसल्याने ३ वर्षे जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला़ हे राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर यापुढे शेतकºयांवर अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी १० आॅक्टोबर २०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली़या योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भू-संजिवनी व्हर्मी कम्पोस्टिंग, भू-संजिवनी नाडेप कम्पोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शौचखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकूर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड, समृद्ध ग्रामयोजना या ११ कलमी कार्यक्रमाचा समावेश केला़ हा ११ कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते़ त्यासाठी उद्दिष्टही देण्यात आले. परभणी तालुक्याला अहिल्यादेवी सिंचन योजनेंतर्गत ४ हजार ५०० विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार ४ हजार ३४ लाभार्थी ग्रामसभेतून निवडण्यात आले़ ११६४ लाभार्थ्यांच्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली़ ७११ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली़ ५७१ विहिरींच्या कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले़ यातील केवळ १४० विहिरींची कामे प्रत्यक्षात सुरू झाली़ मात्र एका वर्षात केवळ २१ कामे पूर्ण झाली आहेत. गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, सेलू या आठ तालुक्यांत एकही काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही़ ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यामध्ये प्राधान्याने राबवावा, असे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष करीत या योजनेतील कामांना एक प्रकारे खो दिल्याचेच दिसून येते़