शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

परभणीत ‘समृद्ध महाराष्ट्र’ योजनेला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:18 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़२०१६ पूर्वी जिल्ह्यात सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती़ केंद्र शासनाच्या वतीने २००८ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी विहीर, शेततळे व सिंचनाच्या सुविधांचे कामे या योजनेंतर्गत करण्यात येत होते़ परंतु, अनेक ठिकाणची कामे ठप्प पडली होती़ सिंचनाची कामे झाली नसल्याने ३ वर्षे जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला़ हे राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर यापुढे शेतकºयांवर अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी १० आॅक्टोबर २०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली़या योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भू-संजिवनी व्हर्मी कम्पोस्टिंग, भू-संजिवनी नाडेप कम्पोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शौचखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकूर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड, समृद्ध ग्रामयोजना या ११ कलमी कार्यक्रमाचा समावेश केला़ हा ११ कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते़ त्यासाठी उद्दिष्टही देण्यात आले. परभणी तालुक्याला अहिल्यादेवी सिंचन योजनेंतर्गत ४ हजार ५०० विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार ४ हजार ३४ लाभार्थी ग्रामसभेतून निवडण्यात आले़ ११६४ लाभार्थ्यांच्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली़ ७११ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली़ ५७१ विहिरींच्या कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले़ यातील केवळ १४० विहिरींची कामे प्रत्यक्षात सुरू झाली़ मात्र एका वर्षात केवळ २१ कामे पूर्ण झाली आहेत. गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, सेलू या आठ तालुक्यांत एकही काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही़ ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यामध्ये प्राधान्याने राबवावा, असे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष करीत या योजनेतील कामांना एक प्रकारे खो दिल्याचेच दिसून येते़