शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

परभणीत ‘समृद्ध महाराष्ट्र’ योजनेला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:18 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एकही काम पूर्णत्वाला गेले नाही़ त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे़२०१६ पूर्वी जिल्ह्यात सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती़ केंद्र शासनाच्या वतीने २००८ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी विहीर, शेततळे व सिंचनाच्या सुविधांचे कामे या योजनेंतर्गत करण्यात येत होते़ परंतु, अनेक ठिकाणची कामे ठप्प पडली होती़ सिंचनाची कामे झाली नसल्याने ३ वर्षे जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला़ हे राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर यापुढे शेतकºयांवर अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी १० आॅक्टोबर २०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली़या योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भू-संजिवनी व्हर्मी कम्पोस्टिंग, भू-संजिवनी नाडेप कम्पोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शौचखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकूर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड, समृद्ध ग्रामयोजना या ११ कलमी कार्यक्रमाचा समावेश केला़ हा ११ कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते़ त्यासाठी उद्दिष्टही देण्यात आले. परभणी तालुक्याला अहिल्यादेवी सिंचन योजनेंतर्गत ४ हजार ५०० विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार ४ हजार ३४ लाभार्थी ग्रामसभेतून निवडण्यात आले़ ११६४ लाभार्थ्यांच्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली़ ७११ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली़ ५७१ विहिरींच्या कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले़ यातील केवळ १४० विहिरींची कामे प्रत्यक्षात सुरू झाली़ मात्र एका वर्षात केवळ २१ कामे पूर्ण झाली आहेत. गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, सेलू या आठ तालुक्यांत एकही काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही़ ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यामध्ये प्राधान्याने राबवावा, असे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष करीत या योजनेतील कामांना एक प्रकारे खो दिल्याचेच दिसून येते़