शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: अतिवृष्टीने बाधित पिकांची चुकीची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:05 IST

कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन, कापूस यासह इतर बागायती पिकांचे मोठे नुकसान केले आहे़ प्रशासनाकडून तहसील कार्यालय, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती प्रशासनाकडून विविध पथकांनी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून प्रशासनाला अहवाल सादर केला़ पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे पावसाने मोठे नुकसान झाले असताना पंचनामे करणाºया अधिकाºयाने चुकीचे पंचनामे केले़ प्रत्यक्षात पूर्ण नुकसान झाले असतानाही केवळ १५ ते २० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनास सादर केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे़पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही टक्केवारी कमी दाखवल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे पिकांचे पुन्हा पंचनामे करून सदरील कामचुकार दोषी ग्रामसेवकांस निलंबन करावे़ कामचुकारपणा करणाºयांवर योग्य कार्यवाही करावी, अन्यथा संपूर्ण कुटुंबिय गुराढोरांसह उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़कंठेश्वर येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनावर शहरप्रमुख मुंजा कदम, रमेश ठाकूर, नरहरी कदम, हरिभाऊ कदम, बाबुराव कदम, संतोबा कदम, नागनाथ कदम, भानुदास कदम, गोपाळ कदम, शिवाजी कदम, मोहन कदम, शिवाजी कदम, गंगाबाई कदम, सखूबाई कदम आदी शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत़कृषी कार्यालयात अधिकारीच नाही४अतिवृष्टीने बाधीत पिकांच्या नुकसानीची चुकीची टक्केवारी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंठेश्वर येथील शेकडो शेतकरी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाºयांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकºयांनी त्यांच्या बंद कक्षाला निवेदन देत रोष व्यक्त केला.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसagricultureशेती