शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

परभणी : १३ वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे पूर्ण होईना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.पैठण ते बाभळीपर्यंत गोदावरी नदीच्या पात्रात बारा उच्च पातळीचे साखळी पद्धतीने बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २००६ मध्ये राज्य शासनाने हाती घेतला होता. ढालेगाव, मुदगल या दोन बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर तारुगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मान्यता मिळाली. तारुगव्हाण बंधाºयास १२३ कोटी रुपयांची मान्यता प्रदान करण्यात आली. निधी उपलब्ध झाल्यानंतर या बंधाºयाचे काम सुरू करण्यात आले. या बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया गोदाकाठच्या परभणी आणि बीड जिल्ह्यातील २१०० हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले असते; परंतु तसे झाले नाही. या बंधाºयाची पाणी क्षमता १५.४० दलघमी एवढी आहे.तारूगव्हाण बंधाºयाचे काम मागील अकरा वर्षे संथ गतीने करण्यात आले. शासनाकडून त्यासाठी वेळेत निधीही उपलब्ध करून देण्यात आला नाही. आता १३ वर्षानंतरही बंधाºयाचे काम पूर्ण होऊन बंधाºयात पाणी अडविण्याचे नियोजन झाले नाही. पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन बंधाºयांत ६० कि.मी.चे अंतर आहे. त्यामुळे दोन्ही बंधारे भरले तरी मधल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यात पाणी साचत नसल्याने या भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तारूगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मंजुरी देऊन गती देण्यात आली आहे; परंतु, कंत्राटदाराच्या उदासिन भूमिकेमुळे या बंधाºयाचे काम १३ वर्षानंतरही सुरूच आहे. बंधाºयासाठी १७ गेट बसविले जाणार आहेत. त्यासाठी १३ वर्षात फाऊंडेशन पूर्ण झाले आहे.या वर्षात गेट बसविण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला खरा. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने ते शक्य झाले नाही. जून महिन्यात माजलगाव भागातील शेतकºयांनी बंधारा पात्रात उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाने १५ जुलैपर्यंत दरवाजे टाकण्याचे काम सुरू करून दरवाजे बसविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले होते; परंतु, अद्याप दरवाजेही बसविण्यात आले नाहीत. दरवाजे उचलण्यासाठी लागणारी यंत्रणाही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या वर्षात पाणी अडविण्यासाठी होणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत.३३ कोटी रुपयांची वाढली किंमततारूगव्हाण परिसरातील शेतकºयांना पाणी उपलब्ध होऊन सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने तारूगव्हाण येथील बंधाºयाला मंजुरी दिली. तेव्हा या बंधाºयाची मूळ किंमत १२३ कोटी रुपये होती. मात्र वेळेत निधीही मिळाला नाही आणि कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे १३ वर्षात बाजारभावाप्रमाणे बंधाºयाची किंमत ३३ कोटी रुपयांनी वाढली गेली आहे. ७० टक्के काम झाले असून त्यावर १०२ कोटी रुपये खर्च करण्यात आला.बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाने यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणीही केली आहे.-आ. मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीWaterपाणी