शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

परभणी : १३ वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे पूर्ण होईना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.पैठण ते बाभळीपर्यंत गोदावरी नदीच्या पात्रात बारा उच्च पातळीचे साखळी पद्धतीने बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २००६ मध्ये राज्य शासनाने हाती घेतला होता. ढालेगाव, मुदगल या दोन बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर तारुगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मान्यता मिळाली. तारुगव्हाण बंधाºयास १२३ कोटी रुपयांची मान्यता प्रदान करण्यात आली. निधी उपलब्ध झाल्यानंतर या बंधाºयाचे काम सुरू करण्यात आले. या बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया गोदाकाठच्या परभणी आणि बीड जिल्ह्यातील २१०० हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले असते; परंतु तसे झाले नाही. या बंधाºयाची पाणी क्षमता १५.४० दलघमी एवढी आहे.तारूगव्हाण बंधाºयाचे काम मागील अकरा वर्षे संथ गतीने करण्यात आले. शासनाकडून त्यासाठी वेळेत निधीही उपलब्ध करून देण्यात आला नाही. आता १३ वर्षानंतरही बंधाºयाचे काम पूर्ण होऊन बंधाºयात पाणी अडविण्याचे नियोजन झाले नाही. पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन बंधाºयांत ६० कि.मी.चे अंतर आहे. त्यामुळे दोन्ही बंधारे भरले तरी मधल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यात पाणी साचत नसल्याने या भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तारूगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मंजुरी देऊन गती देण्यात आली आहे; परंतु, कंत्राटदाराच्या उदासिन भूमिकेमुळे या बंधाºयाचे काम १३ वर्षानंतरही सुरूच आहे. बंधाºयासाठी १७ गेट बसविले जाणार आहेत. त्यासाठी १३ वर्षात फाऊंडेशन पूर्ण झाले आहे.या वर्षात गेट बसविण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला खरा. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने ते शक्य झाले नाही. जून महिन्यात माजलगाव भागातील शेतकºयांनी बंधारा पात्रात उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाने १५ जुलैपर्यंत दरवाजे टाकण्याचे काम सुरू करून दरवाजे बसविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले होते; परंतु, अद्याप दरवाजेही बसविण्यात आले नाहीत. दरवाजे उचलण्यासाठी लागणारी यंत्रणाही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या वर्षात पाणी अडविण्यासाठी होणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत.३३ कोटी रुपयांची वाढली किंमततारूगव्हाण परिसरातील शेतकºयांना पाणी उपलब्ध होऊन सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने तारूगव्हाण येथील बंधाºयाला मंजुरी दिली. तेव्हा या बंधाºयाची मूळ किंमत १२३ कोटी रुपये होती. मात्र वेळेत निधीही मिळाला नाही आणि कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे १३ वर्षात बाजारभावाप्रमाणे बंधाºयाची किंमत ३३ कोटी रुपयांनी वाढली गेली आहे. ७० टक्के काम झाले असून त्यावर १०२ कोटी रुपये खर्च करण्यात आला.बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाने यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणीही केली आहे.-आ. मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीWaterपाणी