शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

परभणी : १३ वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे पूर्ण होईना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बंधाºयाचे गेट बसविण्याचे कामही पूर्ण झाले नसल्याने याहीवर्षी बंधाºयात पाणी आडणार नाही.पैठण ते बाभळीपर्यंत गोदावरी नदीच्या पात्रात बारा उच्च पातळीचे साखळी पद्धतीने बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २००६ मध्ये राज्य शासनाने हाती घेतला होता. ढालेगाव, मुदगल या दोन बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर तारुगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मान्यता मिळाली. तारुगव्हाण बंधाºयास १२३ कोटी रुपयांची मान्यता प्रदान करण्यात आली. निधी उपलब्ध झाल्यानंतर या बंधाºयाचे काम सुरू करण्यात आले. या बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया गोदाकाठच्या परभणी आणि बीड जिल्ह्यातील २१०० हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले असते; परंतु तसे झाले नाही. या बंधाºयाची पाणी क्षमता १५.४० दलघमी एवढी आहे.तारूगव्हाण बंधाºयाचे काम मागील अकरा वर्षे संथ गतीने करण्यात आले. शासनाकडून त्यासाठी वेळेत निधीही उपलब्ध करून देण्यात आला नाही. आता १३ वर्षानंतरही बंधाºयाचे काम पूर्ण होऊन बंधाºयात पाणी अडविण्याचे नियोजन झाले नाही. पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन बंधाºयांत ६० कि.मी.चे अंतर आहे. त्यामुळे दोन्ही बंधारे भरले तरी मधल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यात पाणी साचत नसल्याने या भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तारूगव्हाण येथील गोदावरी नदीपात्रात बंधारा उभारणीच्या कामास मंजुरी देऊन गती देण्यात आली आहे; परंतु, कंत्राटदाराच्या उदासिन भूमिकेमुळे या बंधाºयाचे काम १३ वर्षानंतरही सुरूच आहे. बंधाºयासाठी १७ गेट बसविले जाणार आहेत. त्यासाठी १३ वर्षात फाऊंडेशन पूर्ण झाले आहे.या वर्षात गेट बसविण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला खरा. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने ते शक्य झाले नाही. जून महिन्यात माजलगाव भागातील शेतकºयांनी बंधारा पात्रात उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाने १५ जुलैपर्यंत दरवाजे टाकण्याचे काम सुरू करून दरवाजे बसविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले होते; परंतु, अद्याप दरवाजेही बसविण्यात आले नाहीत. दरवाजे उचलण्यासाठी लागणारी यंत्रणाही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या वर्षात पाणी अडविण्यासाठी होणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत.३३ कोटी रुपयांची वाढली किंमततारूगव्हाण परिसरातील शेतकºयांना पाणी उपलब्ध होऊन सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने तारूगव्हाण येथील बंधाºयाला मंजुरी दिली. तेव्हा या बंधाºयाची मूळ किंमत १२३ कोटी रुपये होती. मात्र वेळेत निधीही मिळाला नाही आणि कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे १३ वर्षात बाजारभावाप्रमाणे बंधाºयाची किंमत ३३ कोटी रुपयांनी वाढली गेली आहे. ७० टक्के काम झाले असून त्यावर १०२ कोटी रुपये खर्च करण्यात आला.बंधाºयाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाने यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणीही केली आहे.-आ. मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीWaterपाणी