शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

परभणी : तहसीलवर धडकला महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:18 IST

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी शहरातील महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना साकडे घातले.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी शहरातील महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना साकडे घातले.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतातील कामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे सोनपेठ शहरातील महिलांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून उदरनिर्वाह भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे. या मागणीसाठी शहरातील गणेशनगर येथून महिलांनी १० डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चात शहरातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. तहसील कार्यालयाच्या परिसरात मोर्चा आल्यानंतर महिलांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनावर सुशीलाबाई काटे, गिरजाबाई सरवदे, गवळण गांगर्डे, चंद्रकला देवरे, यमुनाबाई बरवे, मुक्ताबाई राऊत, सत्यभामा मस्के, शोभा मस्के, मीना मस्के, वर्षा नवघरे या महिलांच्या स्वाक्षºया आहेत.मनरेगाची कामे ठप्प४सोनपेठ तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, सिंचन विहीर यासह वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत; परंतु, जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे तालुक्यात कामे ठप्प पडली आहेत. विशेष म्हणजे दुष्काळामुळे तालुक्यातील शेतीशी निगडीत कामे ठप्प पडल्याने तालुक्यातील मजुरांना मनरेगामधून कामे उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने महिलांना रोजगारासाठी मोर्चा काढावे लागत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाagitationआंदोलन