शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

परभणी शहरात आता चकचकीत रस्ते बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:08 IST

पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली़परभणीच्या मनपा आयुक्तांचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रमेश पवार यांनी भविष्य काळात करण्यात येणाऱ्या कामकाजाविषयीची माहिती दिली़ यावेळी बोलताना पवार म्हणाले की, डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत ‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचे काम संपणार आहे़ त्यानंतर शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार आहे़ त्यावेळी रस्ते खोदावे लागतील़ त्यामुळे आतापासून शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येतील़ शहरातील रस्त्यांचा प्रश्न या माध्यमातून सोडविण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले़ भूमिगत गटार योजनेचा प्लॅन तयार करण्याचे काम सुरू असून, याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, असेही त्यांनी सांगितले़ सिमेंट रस्त्याएवेजी डांबरी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेण्याबाबत काही राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यांनी याला नकार देत हा आपलाच निर्णय असल्याचे सांगितले़परभणी शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा दर आठवड्याला आपण स्वत: आढावा घेत आहे़ डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले़ शहराला सध्या १० ते १२ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ यात सुधारणा कधी होणार? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, त्यांनी शहरात पाण्याची साठवण क्षमता कमी आहे़ त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़ अमृत योजनेतील कामेही वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले़ शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, वृक्ष लागवड करून सुंदर व स्वच्छ शहर करणे, प्रमुख पदांवर कायमस्वरुपी कर्मचाºयांची नियुक्ती करणे याबाबींना आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद या दरम्यानच्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी केला असता, लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले़ कालावधी मात्र त्यांनी सांगितला नाही़ वीज बिल घोटाळा, बचत भवनच्या जागेतील साहित्य नेण्याचे प्रकरण याविषयावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका