शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

परभणी : व्हाईटनरच्या नशेचे विद्यार्थ्यांना व्यसन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:04 IST

दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत.मागील एक ते दोन वर्षापासून हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: शहरातील हुतात्मा स्मारक, शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरातील मुलांमध्ये व्यसन पहावयास मिळत आहे. १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत व्हाईटनर मिळत आहे. मुळात याचा उपयोग चुकीने लिहिलेला मजकूर मिटविण्यासाठी केला जातो. मात्र हल्ली हे व्यसनाचे साधन बनले आहे. विशेषत: शहरातील किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, पानटपरीवरून व्हाईटनर सर्रास विक्रीसाठी ठेवल्या जात आहे. हे व्हाईटनर कोणास द्यावे, याचे निर्बंध नसल्याने ८ वर्षापासून ते १८ वर्षा पर्यतचे विद्यार्थी सहजतेने मिळवितात. ही नशा एवढी गंभीर आहे की, एकदा व्यसन लागले की, सुटत नाही. नशा केली नाही तर ती व्यक्ती बैचेन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. शहरातील हुतात्मा स्मारक, शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरात शाळा व महाविद्यालये आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. नशा करणारे २०० विद्यार्थी शहरात सापडतील. हे विद्यार्थी शाळाबाह्य बनले आहेत. पाच ते दहा विद्यार्थ्यांचा गट तयार करून नशा केली जाते. नशेबरोबरच सिगारेट, गुटखा व दारूच्या नशेकडेही हे विद्यार्थी वळत आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्याच बरोबर पॉकेट मारणे, मारहाण करणे, मुलींची छेडछाड हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे विद्यार्थी शाळेच्या परिसरात तसेच मोकळ्या मैदानात सर्रास वावरताना दिसून येतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन व्हाईटनरच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.व्हाईटनर शरीरात पोहोचल्यानंतर शरीर बधीर करते. त्यानंतर वेडेपणा, स्मृतिभ्रंश, मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी व्हाईटरनरची नशा आहे. एकदा वास घेतल्यानंतर तो वेळोवेळी घ्यावासा वाटतो. चरस, गांजा, अफू जेवढे घातक आहेत. तेवढाच व्हाईटनरचा वास सुद्धा घातक आहे.-डॉ. दुर्गादास कान्हडकर, बालरोग तज्ज्ञ, जिंतूरमुलांवर संस्कार हे आई-वडिलांकडून होणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासनही दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात वेगवेगळ्या नशेबद्दल जनजागृती करीत आहे. नशेपासून विद्यार्थी दूर राहण्यासाठी अधिक प्रभावीपणे जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.-सुरेश नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक, जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थी