शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

परभणी:जलवाहिनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:56 PM

झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथील दोघांवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथील दोघांवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मानवत तालुक्यातील झरी येथील लघू तलावातील उपलब्ध पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठा विभागाने शेतकऱ्यांना सूचना देऊन विद्युत मोटारी काढण्याचे आवाहन करूनही काही शेतकºयांनी पाणी उपसा सुरुच ठेवला होता. यामुळे मागील आठवड्यात नगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत दोन शेतकºयांच्या विद्युत मोटारी जप्त केल्या. त्याच बरोबर १५ मे रोजी प्रशासनाने पुन्हा कारवाई करीत अजून दोन मोटारी जप्त केल्या. प्रशासनाने केलेल्या कारवाईचा राग मनात धरून विनायक सत्वधर व विलास सत्वधर यांनी मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दोन ठिकाणी फोडल्याची तक्रार पाणीपुरवठा अधिकारी प्रताप चव्हाण यांनी दिली. याच तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, १७ मे रोजी सकाळी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी फोडलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी गेले होेते. यावेळी एका ठिकाणी दुरुस्ती केल्यानंतर अन्य एका ठिकाणी पाईपलाईन फोडल्याचे आढळून आले. फोडलेल्या पाईपलाईनमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत वेळ लागू शकतो. या प्रकारामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला परिणाम४झरी येथील तलावातून मानवत शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या तलावात एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पालिकेकडून तलावातून पाण्याचा अवैध उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. कारवाईचा राग मनात धरून झरी येथून आलेली जलवाहिनी दोन ठिकाणी फोडण्यात आली. त्याचबरोबर खोडसाळपणे काही जण विद्युत पुरवठाही बंद करीत आहेत. त्याचबरोबर पालिकेने हाती घेतलेल्या एक्सप्रेस फिडरचे कामही काही जणांनी अडथळा आणून बंद पाडले होते. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :PachoraपाचोराparabhaniपरभणीWaterपाणी