शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परभणी : पूर्णा शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:32 IST

तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.शहराला डिसेंबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी येलदरी जलाशयातून ०.५ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. पूर्णा बंधाºयापर्यंत हे पाणी पूर्ण क्षमतेने पोंहचले नाही. शिवाय या पाणलोट क्षेत्रातून कृषीपंपद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. त्याचबरोबर बंधारा नादुरुस्त असल्याने पाण्याचा दरवेळी मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. मागील महिन्यात आलेले पाणी पूर्णपणे संपले आहे. मागील दहा दिवसांपासून पूर्णा शहरातील नागरिक पाणी टंचाईस तोड देत आहेत. उन्हाळा सुरू होण्यास बराच अवधी असताना शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पूर्णा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधारा परिसरात खोलगट भागात काही प्रमाणात पाणी साठा साचतो, जो नगरपालिकेच्या पंपापर्यंत पोहचू शकत नाही. या खोलगट भागातील पाणी उपसा करणाºया पंपापर्यंत पोहचविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जेसीबी मशीनद्वारे नाला काढण्यात आला आहे. गुरुवारी या कामास सुरुवात झाली असून पाणी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु हे पाणी केवळ आठवडाभरापर्यंत पुरणार आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाण्याची मागणी करण्यात आली असून पाणी पुरवठ्यासाठी १ दलघमी पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. पाण्यासाठी न.प.प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी ते तोडके पडत आहेत. १ फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागात नळाला पाणी आले आहे; परंतु, अजूनही नवीन वसाहती पर्यंत हे पाणी पोहचू शकले नाही. पाण्याअभावी अतिरिक्त पाणी पुरवठा करणाºया यंत्रणा ही बंद पडल्या आहेत.हातपंपाची : पाणीपातळी घटलीशहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी हातपंप आहेत; परंतु, यातील काही हातपंप दुरुस्ती अभावी नादुरुस्त आहेत. तर बहुतांश हातपपांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा, पाण्याचा अवैध उपसा या बाबीमुळे पूर्णा शहराला वारंवार पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई