शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

परभणी : पूर्णा शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:32 IST

तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठीचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.शहराला डिसेंबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी येलदरी जलाशयातून ०.५ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. पूर्णा बंधाºयापर्यंत हे पाणी पूर्ण क्षमतेने पोंहचले नाही. शिवाय या पाणलोट क्षेत्रातून कृषीपंपद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. त्याचबरोबर बंधारा नादुरुस्त असल्याने पाण्याचा दरवेळी मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. मागील महिन्यात आलेले पाणी पूर्णपणे संपले आहे. मागील दहा दिवसांपासून पूर्णा शहरातील नागरिक पाणी टंचाईस तोड देत आहेत. उन्हाळा सुरू होण्यास बराच अवधी असताना शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पूर्णा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधारा परिसरात खोलगट भागात काही प्रमाणात पाणी साठा साचतो, जो नगरपालिकेच्या पंपापर्यंत पोहचू शकत नाही. या खोलगट भागातील पाणी उपसा करणाºया पंपापर्यंत पोहचविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जेसीबी मशीनद्वारे नाला काढण्यात आला आहे. गुरुवारी या कामास सुरुवात झाली असून पाणी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु हे पाणी केवळ आठवडाभरापर्यंत पुरणार आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाण्याची मागणी करण्यात आली असून पाणी पुरवठ्यासाठी १ दलघमी पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. पाण्यासाठी न.प.प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी ते तोडके पडत आहेत. १ फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागात नळाला पाणी आले आहे; परंतु, अजूनही नवीन वसाहती पर्यंत हे पाणी पोहचू शकले नाही. पाण्याअभावी अतिरिक्त पाणी पुरवठा करणाºया यंत्रणा ही बंद पडल्या आहेत.हातपंपाची : पाणीपातळी घटलीशहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी हातपंप आहेत; परंतु, यातील काही हातपंप दुरुस्ती अभावी नादुरुस्त आहेत. तर बहुतांश हातपपांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा, पाण्याचा अवैध उपसा या बाबीमुळे पूर्णा शहराला वारंवार पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई