शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

परभणी : २५ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:59 IST

तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी ): तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागातील गावांसह गोदावरी काठावर असलेल्या गावांनाही आॅक्टोबर महिन्या अखेर पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. नोव्हेंबर २०१८ या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच ग्रामपंचायतमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिग्रहणाचे ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात विहीर, बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली होती. भर हिवाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने तालुक्यातील सुरळवाडी, डोंगरगाव शे., डोंगरजवळा, गोदावरी तांडा, पांगरी, मरगीळवाडी, वाघदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, ढवळकेवाडी, नरळद, सिरसम, कर्लेवाडी, उंबरवाडी, देवकतवाडी, चिम्मा नाईक तांडा, लिंबेवाडी, खादगाव, वाघदरा, वाघदरा तांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव आदी २५ गावांतील ३३ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे दाखल झाले आहेत. यातील २७ प्रस्ताव हे तहसील कार्यालयांतर्गतच्या पाणीपुरवठा विभागाकडे अंतिम आदेशाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. यात डोंगरगाव शे., पांगरी, नरळद, मरगीळवाडी, वागदेवाडी, उंडेगाव, सिरसम, ढवळकेवाडी, देवकतवाडी आदी १४ गावात विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावांना तहसील प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित १३ प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. संबंधित गावच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर विविध गावातील या १३ प्रस्तावांना विहीर, बोअर अधिग्रहणाचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावांच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर या १३ प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केल्यानंतर हे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या लालफितीत महिन- महिना मंजुरी अभावी पडून राहत असल्याने बहुतांश गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामस्तरावरच पाण्याचे नियोजन करुन तातडीने गावकºयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. गावात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने व तालुका प्रशासनाने तातडीने अधिग्रहणासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांतून होत आहे.अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलकडे४तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई नियोजनाचे ठरावासह प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त आहेत. अधिग्रहणासाठीचे हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी तहसीलकडे सादर केले आहेत. तहसीलदारांच्या आदेशाने अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देत असल्याचे पं.स. पाणीपुरवठा विभागातील बोबडे यांनी सांगितले.मंडळ अधिकाºयांच्या अहवालानंतर मंजुरी४पंचायत समिती कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या विहीर, बोअर, अधिग्रहणाच्या प्रस्तावांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निकषाच्या आधीन राहत तलाठी, मंडळ अधिकाºयामार्फत पंचनामा करुन त्यांचा अहवाल कार्यालयास प्राप्त होतो. त्यानंतरच अधिग्रहणाच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आदेश दिला जात असल्याची माहिती तहसील कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे अव्वल कारकून रघुराज जाधव यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई