शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

परभणी : २५ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:59 IST

तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी ): तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागातील गावांसह गोदावरी काठावर असलेल्या गावांनाही आॅक्टोबर महिन्या अखेर पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. नोव्हेंबर २०१८ या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच ग्रामपंचायतमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिग्रहणाचे ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात विहीर, बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली होती. भर हिवाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने तालुक्यातील सुरळवाडी, डोंगरगाव शे., डोंगरजवळा, गोदावरी तांडा, पांगरी, मरगीळवाडी, वाघदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, ढवळकेवाडी, नरळद, सिरसम, कर्लेवाडी, उंबरवाडी, देवकतवाडी, चिम्मा नाईक तांडा, लिंबेवाडी, खादगाव, वाघदरा, वाघदरा तांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव आदी २५ गावांतील ३३ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे दाखल झाले आहेत. यातील २७ प्रस्ताव हे तहसील कार्यालयांतर्गतच्या पाणीपुरवठा विभागाकडे अंतिम आदेशाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. यात डोंगरगाव शे., पांगरी, नरळद, मरगीळवाडी, वागदेवाडी, उंडेगाव, सिरसम, ढवळकेवाडी, देवकतवाडी आदी १४ गावात विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावांना तहसील प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित १३ प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. संबंधित गावच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर विविध गावातील या १३ प्रस्तावांना विहीर, बोअर अधिग्रहणाचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावांच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर या १३ प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केल्यानंतर हे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या लालफितीत महिन- महिना मंजुरी अभावी पडून राहत असल्याने बहुतांश गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामस्तरावरच पाण्याचे नियोजन करुन तातडीने गावकºयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. गावात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने व तालुका प्रशासनाने तातडीने अधिग्रहणासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांतून होत आहे.अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलकडे४तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई नियोजनाचे ठरावासह प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त आहेत. अधिग्रहणासाठीचे हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी तहसीलकडे सादर केले आहेत. तहसीलदारांच्या आदेशाने अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देत असल्याचे पं.स. पाणीपुरवठा विभागातील बोबडे यांनी सांगितले.मंडळ अधिकाºयांच्या अहवालानंतर मंजुरी४पंचायत समिती कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या विहीर, बोअर, अधिग्रहणाच्या प्रस्तावांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निकषाच्या आधीन राहत तलाठी, मंडळ अधिकाºयामार्फत पंचनामा करुन त्यांचा अहवाल कार्यालयास प्राप्त होतो. त्यानंतरच अधिग्रहणाच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आदेश दिला जात असल्याची माहिती तहसील कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे अव्वल कारकून रघुराज जाधव यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई