शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

परभणी : २५ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:59 IST

तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी ): तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागातील गावांसह गोदावरी काठावर असलेल्या गावांनाही आॅक्टोबर महिन्या अखेर पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. नोव्हेंबर २०१८ या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच ग्रामपंचायतमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिग्रहणाचे ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात विहीर, बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली होती. भर हिवाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने तालुक्यातील सुरळवाडी, डोंगरगाव शे., डोंगरजवळा, गोदावरी तांडा, पांगरी, मरगीळवाडी, वाघदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, ढवळकेवाडी, नरळद, सिरसम, कर्लेवाडी, उंबरवाडी, देवकतवाडी, चिम्मा नाईक तांडा, लिंबेवाडी, खादगाव, वाघदरा, वाघदरा तांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव आदी २५ गावांतील ३३ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे दाखल झाले आहेत. यातील २७ प्रस्ताव हे तहसील कार्यालयांतर्गतच्या पाणीपुरवठा विभागाकडे अंतिम आदेशाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. यात डोंगरगाव शे., पांगरी, नरळद, मरगीळवाडी, वागदेवाडी, उंडेगाव, सिरसम, ढवळकेवाडी, देवकतवाडी आदी १४ गावात विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावांना तहसील प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित १३ प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. संबंधित गावच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर विविध गावातील या १३ प्रस्तावांना विहीर, बोअर अधिग्रहणाचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावांच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर या १३ प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केल्यानंतर हे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या लालफितीत महिन- महिना मंजुरी अभावी पडून राहत असल्याने बहुतांश गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामस्तरावरच पाण्याचे नियोजन करुन तातडीने गावकºयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. गावात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने व तालुका प्रशासनाने तातडीने अधिग्रहणासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांतून होत आहे.अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलकडे४तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई नियोजनाचे ठरावासह प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त आहेत. अधिग्रहणासाठीचे हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी तहसीलकडे सादर केले आहेत. तहसीलदारांच्या आदेशाने अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देत असल्याचे पं.स. पाणीपुरवठा विभागातील बोबडे यांनी सांगितले.मंडळ अधिकाºयांच्या अहवालानंतर मंजुरी४पंचायत समिती कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या विहीर, बोअर, अधिग्रहणाच्या प्रस्तावांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निकषाच्या आधीन राहत तलाठी, मंडळ अधिकाºयामार्फत पंचनामा करुन त्यांचा अहवाल कार्यालयास प्राप्त होतो. त्यानंतरच अधिग्रहणाच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आदेश दिला जात असल्याची माहिती तहसील कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे अव्वल कारकून रघुराज जाधव यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई