शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:01 IST

गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.

परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणीलोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.पाथरी तालुक्यातील बहुतांश भाग हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके शेतकºयांच्या हातची गेली आहेत.रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आल्याने थोड्याफार प्रमाणात पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र त्यानंतर ज्वारी, हरभरा, गहू आणि ऊस या पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे पाथरी तालुक्यात रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक दिवासांपासून शेतकºयांकडून करण्यात येत होती. स्थानिक आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाणी सोडावे, असा अग्रह धरला होता.मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी एक पाणीपाळी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार २३ जानेवारी रोजी धरणातून २०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या मुख्य कालव्यात कमी वेगाने पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची गती संथ राहिली. त्यातच १ फेब्रुवारी रोजी जायकवाडी धरणाच्या मुुख्य कालव्यात देवनांद्रा जवळ ४४६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.सध्या पाथरी उपविभागात शाखा कालवा बी-५९ हातगाव वितरिकेवर १५२ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाथरी आणि मानवत तालुक्यातील ६ शाखांमध्ये ३ हजार ५०० हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यातच हे पाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व उसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.पाणीपातळीतही होणार वाढपाथरी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे बहुतांश गावातील विहीर, बोअर, हातपंप कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाला स्त्रोतांचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे; परंतु, पाटबंधारे विभागाच्या वतीने जायकवाडी धरणाच्या मुख्य कालव्यात ४४६ क्युसेसने पाणी सोडले आहे. हे पाणी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास एक महिना राहणार आहे.४या कालव्याच्या पाण्यामुळे शेतातील सिंचन विहिरींसह गाव परिसरातील जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जायकवाडीच्या या पाण्यामुळे काही अंशी सिंचनाबरोबरच पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाथरी भागात दाखल झाले असून २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पाळी सुरू राहणार आहे.-दिवाकर खारकर, उपअभियंता जायकवाडी, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी