शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:01 IST

गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.

परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणीलोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आहे. या पाण्यामुळे काही अंशी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.पाथरी तालुक्यातील बहुतांश भाग हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके शेतकºयांच्या हातची गेली आहेत.रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आल्याने थोड्याफार प्रमाणात पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र त्यानंतर ज्वारी, हरभरा, गहू आणि ऊस या पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे पाथरी तालुक्यात रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक दिवासांपासून शेतकºयांकडून करण्यात येत होती. स्थानिक आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाणी सोडावे, असा अग्रह धरला होता.मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी एक पाणीपाळी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार २३ जानेवारी रोजी धरणातून २०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या मुख्य कालव्यात कमी वेगाने पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची गती संथ राहिली. त्यातच १ फेब्रुवारी रोजी जायकवाडी धरणाच्या मुुख्य कालव्यात देवनांद्रा जवळ ४४६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.सध्या पाथरी उपविभागात शाखा कालवा बी-५९ हातगाव वितरिकेवर १५२ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाथरी आणि मानवत तालुक्यातील ६ शाखांमध्ये ३ हजार ५०० हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यातच हे पाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व उसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.पाणीपातळीतही होणार वाढपाथरी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे बहुतांश गावातील विहीर, बोअर, हातपंप कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाला स्त्रोतांचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे; परंतु, पाटबंधारे विभागाच्या वतीने जायकवाडी धरणाच्या मुख्य कालव्यात ४४६ क्युसेसने पाणी सोडले आहे. हे पाणी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास एक महिना राहणार आहे.४या कालव्याच्या पाण्यामुळे शेतातील सिंचन विहिरींसह गाव परिसरातील जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जायकवाडीच्या या पाण्यामुळे काही अंशी सिंचनाबरोबरच पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाथरी भागात दाखल झाले असून २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पाळी सुरू राहणार आहे.-दिवाकर खारकर, उपअभियंता जायकवाडी, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी